Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती : ईदच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणं, दोघांना अटक

Updated: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (20:20 IST)
 
आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांविरोधत कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. ते म्हणाले, "मिरवणुकीत जल्लोष सोडून दुसऱ्याला जिवे मारण्याची मानसिकता चुकीची आहे. दुसऱ्याचा जीव घेण्याच्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतो. हे सगळे लोक PFI शी निगडीत आहेत. ही मानसिकता मुस्लिमांमध्ये पसरवत आहेत. सोबतच हिंसाचाराचं समर्थन करणारे लोक आहेत. यांना थांबवण्यासाठी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी."
याबदद्ल माहिती देताना अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाथ बारगड म्हणाले, "9 तारखेला ईदची मिरवणूक परतवाडा येथे चालू असताना त्यात काही आक्षेपार्ह गाणी वाजवण्यात आली. याबद्दल परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे."
 
तर नेत्यांनी सामाजिक भान ठेवलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
 
"सध्या देशातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण कलुशित झालेलं आहे. सत्तेसाठी संविधानाच्या पलीकडे जाऊन सत्ता हस्तगत करण्याचे प्रकार सुरू आहेत. देशामध्ये स्थिरता नाही, अशा वेळी सामाजिक नेत्यांनी भान ठेवलं पाहिजे. सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडू नये, याच भान ठेऊन आपले उपक्रम, कार्यक्रम राबवले पाहिजे. अशा द्वेशामधून, रागातून किंवा संतापाने जी धर्मांधता दाखवतो त्यामुळे सामान्य माणसाचं नुकसान होतं. हे जर टाळायचं असेल तर भान ठेवलं पाहिजे, पण सामाजिक सलोखा बिघवण्याच जर कुणी काम करत असेल मग तो कोणत्याही जातीचा असो त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस काँग्रेस किशोर बोरकर यांनी दिली आहे.
 
गेल्या काही काळापासून अमरावती शहरात हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणाऱ्या काही घटना घडल्या आहेत. नुपूर शर्मा प्रकरणानंतर अमरावतीमध्ये एका औषधविक्रेत्याची हत्या करण्यात आली होती.
 
औषधी दुकानाचा व्यवसाय असलेले उमेश कोल्हे 'ब्लॅक फ्रिडम' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य होते. या ग्रुपमध्ये हिंदुत्ववादी स्वरूपाच्या पोस्ट जास्त शेयर व्हायच्या. काही दिवसांपूर्वी उमेश कोल्हेंनीसुद्धा नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारी एक पोस्ट इथे टाकली होती.
 
अमरावती पोलिसांना संशय आहे की हीच पोस्ट ग्रुपच्या बाहेर व्हायरल झाली असावी किंवा कोल्हे यांच्या हातून चुकून एका मुस्लिम ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यामुळे उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला झाला होता.
त्याआधी 12 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या हिंसाचारानंतर 1 आठवडा अमरावती शहर बंद होतं.
 
जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती शहरात एक आठवडा संचारबंदी लागू केली होती. तसंच शहरात चार दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं होतं.
Published By- Priya Dixit 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

पुण्यात दहीहंडी कार्यक्रमानंतर लोखंडी कमान डोक्यावर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील बाईक टॅक्सींमुळे ८० दशलक्ष लोकांसाठी कमाईच्या संधी निर्माण होतील, रॅपिडोने गडकरींच्या वक्तव्याचे स्वागत केले

LIVE: नागपूरच्या ऐतिहासिक बरकास चौक परिसरात आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान झटापट

Kia ची पहिली हायब्रिड SUV 'सोरेन्टो' भारतात लाँच; १० एअरबॅग्ज आणि AI असिस्टंटने सुसज्ज

धाकट्या जावाने टोमणा मारला, रागाच्या भरात मोठ्या जावाने चाकूने भोसकून मृतदेह हौदात फेकला

पुढील लेख
Show comments