Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फैजपूरला

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:14 IST)
 
1936 मध्ये जिल्ह्यातील फैजपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. पक्षाचे ते पहिले ग्रामीण अधिवेशन होते. म. गांधी पासून पंडित नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद ते वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत राष्ट्रीय नेत्यांनी या फैजपूरला हजेरी लावली होती. स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आणिबाणीनंतर देखील जनता पक्षाच्या राजवटीत जळगावच्या लोकसभेच्या जागा या काँग्रेसनेच जिंकल्या होत्या. प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरींसारखे नेते या जिल्हयाने राज्याला दिले होते. नंतर मात्र जिल्हयात पक्षाला ओहोटी लागली. आज जिल्ह्यात काँग्रेस मृतप्राय झालेली आहे.
 
पक्षात कार्यकर्ते कमी आणि गटबाजीत अडकलेले नेते असे चित्र असून, याचा फटका पक्षाला बसला आहे. याबाबत विचारता विनायकराव देशमुख यांनी चिंता व्यक्त करत ही बाब प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये परत नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यंदा फैजपूरला प्रदेश अधिवेशन घेणार आहेत. याबाबत त्यांनी फैजपूर येथे त्यांच्या दौऱ्यात तसे सांगितले होते. आता आपल्याला प्रदेश अधिवेशन घेण्याबाबत पूर्वतयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments