Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग

Updated: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:35 IST)
 
पदयात्रेच्या माध्यमातून या बहिऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दिवाळीच्या आत जर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सत्ताधाऱ्यांना दिसतील तिथे घेराव घालू, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग  यांनी दिला. या निवेदनानुसार आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही, जीएसटी व नोटाबंदीमुळे उद्योग, व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. शासनाच्या रोज बदलत्या निर्णयांमुळे नोकरदार परेशान आहेत. याबाबत अनेक आंदोलने करूनही सरकारला जाग आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पदयात्रा काढली. यात विविध प्रश्नांचा भडिमार सरकारवर करत 'जवाब दो' पदयात्रा आंदोलनातून करण्यात आले.
 
यावेळी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, प्रदेश सरचिटणीस ययाती नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष वर्षा निकम, प्रदेश संघटन सचिव उत्तमराव शेळके,जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांना अटक

मुंबई-पुणे मिसिंग लिंक अपघातात काँग्रेसचे तरुण नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू

हिमाचलच्या चंबामध्ये भीषण बस अपघात, ७ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

भारतावर १००% शुल्क लावण्याची तयारी? सिनेटने विधेयक मंजूर केले

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे नामिबियामध्ये टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळणार

पुढील लेख
Show comments