suvichar

फडणवीसांचा ताफा शेतकऱ्याने अडवून आत्महत्येचा प्रयत्न

Updated: मंगळवार, 1 जून 2021 (18:11 IST)
 
गेल्या आठवड्यात आलेल्या मान्सून पूर्व अकाली पावसामुळे शेतकरींच्या केळीच्या बागेचे भरपूर नुकसान झाले त्यामध्ये त्यांचे सुमारे 20 हजार केळीचे झाडे उध्वस्त झाले. योगेश पाटील मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावातील रहिवासी असून त्यांचे केळीचे बाग आहे.त्या बागेचे पाऊसामुळे भलेमोठे नुकसान झाले आहे. 
 
दोन दिवसापूर्वीच जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील हे पाहणी साठी आले आणि त्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत केली जाईल असे म्हणून आश्वस्त केले होते.परंतु अद्याप पंचनामे केले नाहीत. आज देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी आले परंतु आपल्या शेतात पाहणी केली नाही हा राग योगेशच्या मनात होता. त्या मुळे त्याचा संताप अनावर होऊन त्याने हे पाऊल उचलले. 
 
फडणवीस यांचा ताफा उंचदाच्या रस्त्यावरून जात असताना त्याने ताफा अडविला आणि हातातील विष प्राशन करू लागला तेवढ्यात त्याला पोलिसांनी अडविले आणि असं करण्याचे कारण विचारले असताना तो म्हणाला की शेतकऱ्यांना राज्याकडून एक रुपयाची ही कसलीच मदत होत नाही. शेतकऱ्यांनी काय करावे. असा राग त्याने व्यक्त केला.  
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments