suvichar

नाशिकला पुराचा धोका, सतर्कतेचे आव्हान

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (11:52 IST)
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. निवासी उपजिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी नागरिकांना या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 
 
गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 
जिल्ह्याच्या काही भागात 29 सप्टेंबर रोजी गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान केंद्राने दिला असून या संबंधात, नागरिकांनी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. 
 
पूरप्रवण भागातील सर्व गावे, नदी-नालाकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी आणि धरणात प्रवेश करू नये, आपले पशुधन आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रशासनाने गावांना सावध करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन संबंधित संस्थांना केले आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

सायबर फसवणुकीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तात्काळ ऑटो ई-झिरो एफआयआर नोंदवला जाईल

UPI वापरताना लोक नकळत करतात या 5 चुका

हवामान विभागाचा मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी

प्रियकराची हत्या करून बाथरूममध्ये बोऱ्यात कोंबला; नळ सोडला अन् पळ काढला!

मुंबईतील चैत्यभूमीवर आंदोलक आणि पोलिसांत झटापट; NEET विरोधातील निदर्शकांना पोलिसांकडून रोखण्यात आले

पुढील लेख
Show comments