Festival Posters

अखेर जायकवाडीचे दोन दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक सोबत उत्तर महाराष्ट्रात गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना मराठवाडा मात्र अजूनही पाऊस झाला नाही. मात्र  नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दमदार  पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९० टक्के पेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला त्यामुळे  आता जायकवाडीचे दोन दरवाजे अर्धा फूटांनी उघडण्यात आले आहे. यातून एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. 
 
पूर्ण राज्यात आईवेळी कमी दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र दुष्कळा ग्रस्त मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. आता तर पावसाळा संपत आला असून, अजूनही त्या ठिकाणी  समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक धरण कोरडी पडली आहेत. तर दुसरीकडे गोदावरी नदीचाच उगम उगम असलेल्या नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार  पावसामुळे व नाशिकला आलेल्या महापुरामुळे जायकवाडीत पाणी आल्याने औरंगाबाद, जालना, परभणीसह काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
नाशिक, नगरकडून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी मोठ्या प्रमाणत भरत आले असून, त्यामुळे  नाथसागरात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याची अमलबजावणी करण्यात आली आहे. अजूनही नाशिक नगर येथे परतीचा पाऊस सुरु होणार आहे, त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणत पाणी जयकवाडीत जमा होईल त्यामुळे त्याचा फायदा औरंगाबाद सोबत जालना आणि इतर कोरड्या जिल्ह्यांना नक्कीच होणार आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दहशत माजवणाऱ्या जखमी बिबट्याला वनविभागाने पकडले

LIVE: पुण्यात 'हीट स्ट्रेस' वाढत असून, तो थर्मामीटर तापमानापेक्षाही अधिक धोकादायक

80 लाख महिला अपात्र बाबत अदिती तटकरे यांचे विरोधकांना उत्तर, स्पष्टीकरण दिले

पुण्यातील उष्णतेचा वाढता ताण शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्य संकटाचा इशारा दिला

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या इंधन दरांमुळे नवीन शैक्षणिक सत्रात स्कूल बस आणि ऑटोच्या भाड्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होणार

पुढील लेख
Show comments