Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायकोला सोड माझ्याशी लग्न कर, महिलेच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

Updated: शुक्रवार, 17 मे 2019 (16:55 IST)
 
पुणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला असलेली गौरी व नगरमधील सागर यांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, गौरी हिने प्रेमाचा गैरफायदा घेत सागर याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. बायकोला सोडून तू माझ्याबरोबर राहण्यास ये, अशी मागणी ही महिला वेळोवेळी फोनवरून करत होती. पैशांची मागणी देखील ती करत होती. अखेर तिच्या जाचाला कंटाळून सागरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी व मोबाईलवरील मेसेज पाहता संबंधित महिलेनेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करत गौरीला पुणे जिल्ह्यातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता तिला १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
सागर हा एक होतकरू तरूण होता. परंतु गौरीच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, गौरीला सोडू नका, असे त्याने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित म्हटले आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

गायीला राष्ट्रमाता म्हणून घोषित करा, स्वतंत्र गोमंत्रालयाच्या मागणीसाठी गोंदियात मोठे आंदोलन

LIVE: पुण्याला वाहतूक कोंडीतून दिलासा, इनर रिंग रोड-टनेल नेटवर्क प्रकल्पाला मंजुरी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपकेच्या आईने लग्नाबद्दल खुलासा केला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली, रोहित पवारांचा सरकारवर हल्ला

पुढील लेख
Show comments