Festival Posters

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका

बुधवार, 5 जुलै 2023 (08:10 IST)
MP Sanjay Raut criticizes Ajit Pawar  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.  यावर आता राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले.
 
'त्यांनी साद घातली तर प्रतिसाद देणार', ठाकरेंकडे परतण्याबाबत शंभूराज देसाईंचे मोठे विधान...
 
राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले
राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, अजित पवारांची अक्कल काढणाऱ्या संजय राऊतांनी अगोदर मेंदू तपासून घेतला पाहिजे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना फुटली. त्यांनी उद्धव ठाकरेंचं साम्राज्य उद्धस्त केलं, असा आरोपही पाटील यांनी राऊतांवर केले.
 
'संजय राऊत हे फक्त बोलबच्चन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संजय राऊतांमुळेच पडले, अजित पवारांना अक्कल शिकवणारा हे संजय राऊत एका निवडणुकीत जनतेतून आलेले नाहीत. अजितदादा विधानसेभेत देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून आले आहेत, संजय राऊत यांना फक्त वर्तमानपत्रात लिहिण्याची अक्कल आहे. राऊतांनी शिवसेना फोडली, यांच्या तोंडाला चाप लावण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी केली.    
 
'राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्याइतपत अजित पवार यांना अक्कल नाही. त्यांना दिल्लीतून आदेश आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पक्षावर दावा केला, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. पण या संकटकाळात शरद पवार एकटे नाहीत. शिवसेना त्यांच्या साथीला आहे, असं सांगतानाच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडून कुणाला जर मास्टरस्ट्रोक मारला असं वाटत असेल तर २०२४ ला आमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा येऊ द्यात, असे मास्टरस्ट्रोक काय असतात हे दाखवून देतो,असंही राऊत म्हणाले होते.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: २७ जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा जारी

बारमाही नफा देणारा व्यवसाय, बाजारात दररोज प्रचंड मागणी; टोमॅटोची यशस्वी लागवड

अपघाताशिवाय कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा धोका, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला

बारामती पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, सुनेत्रा पवार यांचे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments