Marathi Biodata Maker

मुंबई विद्यापीठाचा ऑनलाइन गोंधळ सुरुच

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षणव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला मुंबई विद्यापीठातला गोंधळ संपता संपत नाही. सरकार मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मुंबई विद्यापीठाच्या पीचडीसाठी पूर्वपरीक्षा म्हणजेच 'पेट' यंदा प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली. मात्र याच विद्यापीठाने नेहमीप्रमाणे मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. रिसर्च मेथडॉलॉजी हा पेपर सर्वच विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये देऊन टाकला. यामुळे इतर भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला तर अनेक ठिकाणी नेटवर्क डाऊन झाल्याने परीक्षा काही वेळ उशिराने सुरू झाली. या परीक्षेस सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मराठी, इतिहास यांसारख्या विषयांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रिसर्च मेथडॉलॉजीचा पेपर ५० मार्कांचा आल्याने अनेक जण गोंधळात पडले. अनेकांना या गोंधळातच परीक्षा द्यावी लागली तर अनेकांनी प्रश्न सोडून दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
ऑनलाईनच्या नावाखाली विद्यार्थी भरडला जात आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला या समस्या दिसत नाहीत का, असा सवाल प्रश्न मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमोल मटाले   यांनी प्रशासनाला विचारला आहे. अनेक आश्वासने देऊन त्याची पूर्तता या सरकारकडून झाली नाही. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे मातेले यांनी स्पष्ट केले.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

LIVE: मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे होणार राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊतांचा दावा

आता फक्त २४ रुपयांमध्ये JioFinance द्वारे ITR दाखल करा आणि JioPoints चा फायदा मिळवा

पुढील लेख
Show comments