आंबेडकर स्मारकाबाबत सरकारने मोठा गाजावाजा केला. मुळात आंबेडकरांच्या स्मारकाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती. आदरणीय पवार साहेब व आदरणीय अजित पवार यांनी वेळोवेळी त्याबाबत प्रयत्न केला होता. या सरकारने स्मारकाचे भूमीपूजन केले पण आज तीन वर्ष झाली सरकार येऊन तरी स्मारक बांधलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबत आंदोलन छेडावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल.
आजही काही ठिकाणी सामाजिक विषमता पाळली जाते ती संपवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करायला हवे. समाजात प्रत्येकाला न्याय मिळायला हवा अशी भूमिका आदरणीय शरद पवार साहेबांची असते. याच भूमिकेसाठी आपण कार्यरत राहायला हवे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली.