Dharma Sangrah

राज्यात सर्वत्र पाऊस, शेतकरी सुखावला

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात पावसाचे दमदार पुरागमन झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाच्या पुनरागमनामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. राज्यातील धरणातील पाण्याच्या साठ्यातही चांगली वाढ झाली आहे. बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पिकांवर आलेले विघ्न काहीसे टळल्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे. पुढच्या 48 तासांतही कोकणासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सुरुवातीला पडलेल्या चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके संकटात सापडली होती. शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी दुबार पेरणीही केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली होती. पावसाअभावी राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढली होती. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

२० हजारांच्या बजेटमध्ये ३ बेस्ट स्मार्टफोन्स, ७०००mAh बॅटरी और गेमिंग प्रोसेसरचे दमदार कॉम्बो

LIVE: महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

The monsoon session महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून पासून होणार

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीला ED ची नोटीस?

Rifts in Mahayuti निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव गायब, संतप्त शिवसैनिकांचा नवी मुंबईतील कार्यक्रमात राडा

पुढील लेख
Show comments