Festival Posters

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस

शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:37 IST)
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतलीय. मात्र राज्यात 1  सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
 
 27 ते 30 ऑगस्टदरम्यान काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
 
नैऋत्य मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या ( परतीकडे) टप्प्यात प्रवेश करेल, जे सामान्य तारखेच्या सुमारे पंधरवडा आधी असेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी ही माहिती दिली. नैऋत्य मान्सून परतीची साधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. तथापि, नैऋत्य मान्सूनची वास्तविक परतीचा प्रवास हा सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर होतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
 
IMD ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजामध्ये म्हटले आहे की, वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून 1 सप्टेंबरपासून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: लोकसभेने ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

ठाकरे गटाला मोठा धक्का; लोकसभा सचिवालयाने सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला

महाराष्ट्रात वार्षिक कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार, विजेत्यांना अजित पवार यांच्या नावाने २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments