Festival Posters

खड्डेच बघण्यासाठी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. भाषणात त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधत म्हटले की चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवल्याने त्याचा आपल्याला काय उपयोग? चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता. असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टीका केली.
 
पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जेथे बोलत असताना राज ठाकरे यांनी गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था यावर जोरदार टीका केली.
 
राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की राज्यातील सर्वच पक्षांनी तुमचा भ्रमनिरास केला तरी तुम्ही त्यांना परत कशाला मतदान करता?
 
त्यांनी म्हटले की अनेक लोक राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष बदलत असल्याचं सांगतात अरे पण कशाला खोटं बोलताय?, असा म्हणत राज ठाकरेंनी दलबदलूंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की सत्ताधारी पक्षाने दुसऱ्या पक्षांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष वाढवून दाखवावा. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: मुंबईतील बेस्ट बस सेवा थांबली, कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

नागपूर धर्मांतरण टोळीचा सूत्रधार मौलाना पोलिसांचा शरण आला

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप वर धार्मिक ध्वज फडकवल्याने मोठा गदारोळ

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेल्या १४ महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments