Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे अयोध्या दौरा आणि औरंगजेबाच्या कबरीविषयी म्हणाले...

Updated: रविवार, 22 मे 2022 (14:28 IST)
 
एवढा राडा झाल्यावर लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेला काहीच वाटलं नाही? हो सगळे ढोंगी आहेत. खरं हिंदुत्व काय आहे याचे रिजल्टस हवेत लोकांना. जे आम्ही देतोय.
 
उद्धव ठाकरे यांच्या सभेवर
उद्धव ठाकरेंनी एक सांगावं तुमच्यावर एकतरी आंदोलनाची केस आहे? परवा मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीनगर झालं काय, नाही झालं काय? मा बोलतोय ना? अरे पण तू कोण आहेस?
 
पंतप्रधान मोदींना माझी विनंती आहे की, औरंगाबादचं नाव लवकरात लवकर संभाजीनगर करा. ध्रुवीकरणासाठी MIM पक्षाला मोठं केलं. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या.
 
औरंगजेब आणि एमआयएम
औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवतात. आपल्याला लाजा वाटत नाही. राज्यकर्तेच तसे आहेत. शरद पवारांना औरंगजेब संत वाटायला लागला काय? औरंगजेब राज्य विस्तारण्यासाठी आला होता असं सांगितलं जातं. तुमच्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास का सांगता?
 
एमआयएमचा माणूस औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यावर महाराष्ट्र खवळेल असं वाटलं, पण काही नाही. थंड पडला महाराष्ट्र.
 
अफजलखानची मशिद ऊभी राहिली. त्याच्याचसाठी फंडींग येतं. कोण देतं फंडिंग? याचं कारण आम्ही शांत आहोत. आम्हाला काहीच पर्वा नाही.
 
मशिदीवरचे भोंगे
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. मशिदीवरचे भोंगे सुरू होतील. ते तुम्हाला चेक करतायेत. अता सुरु केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका.
 
भोंग्याच्या प्रकरणामुळे मनसेच्या 28 हजार कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या. हिंदू पोरांवरती केसेस टाकल्या जात आहेत.
 
पुढची योजना
लवकरच मी एक पत्र देणार आहे. भोंगा आंदोलन सुरु ठेवायचंय. हे पत्र घरोघरी पोहोचवाल ही अपेक्षा. माझ्यावरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी एक दीड महिन्यांनी परत तुमच्यासमोर येईल आणि मला का वाटतं ते सांगेल.
 
याआधी काय घडलं?
राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता.
 
राज ठाकरे यांनी 20 मे रोजी ट्वीट करून सांगितले की अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर बोलूच असे त्यांनी म्हटले होते.
 
राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा तुर्तास रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः ट्वीटरवर याची माहिती दिली होती.
 
राज यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या पायावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे.
 
राज ठाकरे यांच्या पायावर या आधीही काही महिन्यापूर्वी शस्रक्रिया झाली होती.
 
राज ठाकरे गेल्यावर्षी मार्चमध्ये टेनिस खेळताना पडले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पायाचं दुखणं सुरू झालं. एप्रिल महिन्यात त्यांनी ऑपरेशन केलं होतं.
 
पण त्यानंतरही दुखणं बरं झालेलं नाही. आता पुन्हा त्यांचा पाय दुखणं सुरू झालंय. डॅाक्टरांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे दौरा रद्द झालाय, अशी चर्चा सुरू झालीये.
 
अयोध्या दौऱ्याला विरोध
राज्यातले मशिदीवरचे भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला आहे.
 
"उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही. 5 जूनसाठी आमची तयारी सुरू आहे. यात संतांचाही सहभाग आहे. संत जे सांगतील ते इथे होईल," असं बृजभूषण यांनी म्हटलंय.
 
राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शनसुद्धा केलं होतं.
 
राज ठाकरे आज पुण्यात सभा घेत असून याआधी त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद येथे सभा घेतली आहे.
 
संजय राऊतांचा टोला
राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना टोला हाणला होता.
 
"इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते पण त्यांनी ते रद्द केले हे माध्यमांकडून मला समजलं. आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग अयोध्येत आहे. असं कळलं की ते जात नाहीत," असं राऊत म्हणाले
 
तसंच "भारतीय जनता पक्षाने असं त्यांच्या बाबतीत का करावं. भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं," असासुद्धा टोला राऊत यांनी हाणला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments