Festival Posters

ही तर अराजकतेकडे वाटचाल : राज ठाकरे

शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:16 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांवरच न्याय मागण्याची वेळ येतेय, यावरून देश किती अराजकतेकडे चालला आहे याची कल्पना येते, अशी  प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे व्यक्‍त केली.

सरकार सर्वत्र नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. माध्यमेही उघडपणे बोलू शकत नाहीत. आता तर न्याय व्यवस्थेवरच नियंत्रण ठेवण्याचा सरकारकडून प्रयत्न झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली बाजू मांडल्यानंतर स्पष्ट होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडत आहे. त्यामुळे त्या न्यायाधीशांचा किती कोंडमारा झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

सरकारच्या प्रत्येक ठिकाणच्या अतिक्रमणावर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘अडीच माणसे देश चालवत आहेत.’ ही सर्व परिस्थिती देश अराजकतेकडे वाटचाल करत असल्याचे दाखवण्यास पुरेशी आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच, असेही ते यावेळी म्हणाले. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांचा 'रेड अलर्ट' जारी, मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' सारखी कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक्स आणि हानिकारक खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

LIVE: उद्धव ठाकरेगटातील उपनेत्या शुभांगी पाटील हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील होणार

सरखेल कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे प्रमुख आणि भारतीय नौदलाचे आद्य जनक यांची संपूर्ण माहिती व इतिहास

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का! उपनेत्या शुभांगी पाटील हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील होणार

पुढील लेख
Show comments