suvichar

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही; सरासरीनेच गुण देणार

सोमवार, 1 जून 2020 (07:52 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत चर्चा सुरू होती. परीक्षा होणार कि नाही? असा संभ्रम विद्यार्थी आणि पालकांमध्ये झाला होता. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. सध्या तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला तेव्हा ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्यातल्या कुलगुरूंसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षा न घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.
 
जूनमध्ये परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. जुलैमध्ये परीक्षा होतील याची शक्यता नाही. ऑगस्टमध्ये काय होईल याची कल्पना नाही. तोवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवता येणार नाही. त्यामुळे सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून अंतिम गुण दिले जाणार आहेत. त्यावर निकाल दिला जाणार आहे. तर आपले गुण कमी झाले आहेत, असे कोणत्या विद्यार्थ्याला वाटलं तर त्यांना पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जसं जमेल तसं पुन्हा परीक्षा देण्याची देखील संधी दिली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

World Environment Day 2026 Speech जागतिक पर्यावरण दिन भाषण

विद्यापीठ विस्तार आणि आर्थिक क्षेत्रातील नवीन भरतीला मंजुरी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

नाशिकातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, पोलिसांनी तपास सुरु केला

नाशिकमध्ये दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशिकमधील बस स्थानकावर एका महिला प्रवाशाचे दागिने आणि रोख रकम चोरली

पुढील लेख
Show comments