Dharma Sangrah

समृद्धी महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (11:32 IST)
समृद्धी महामार्गावर कार ने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. 
उभ्या कंटेनरला समृद्धी महामार्गावर भरधाव येणाऱ्या कार ने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.मयत तिघे जालना जिल्ह्यातील आहे.  

सदर घटना समृद्धी महामार्गावर धोत्रे ग्राम पंचायतीच्या हद्दीत घडलाय आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. शिर्डीच्या दिशेने  भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाला उभ्या कंटेनरच्या अंदाज आला नाही आणि कार ने जोरदार धडक दिली . या अपघातात तिघांचा मृत्यू  झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, आणि भाऊसाहेब पैठणे अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: लोकसभेने ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

ठाकरे गटाला मोठा धक्का; लोकसभा सचिवालयाने सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला

महाराष्ट्रात वार्षिक कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार, विजेत्यांना अजित पवार यांच्या नावाने २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments