Dharma Sangrah

त्र्यंबकेश्वर – संचारबंदीचं पालन करीत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी

Updated: शनिवार, 8 मे 2021 (10:01 IST)
 
भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहा तील विठ्ठल, रुक्मीणी, आदिशक्ती  मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते  सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे .
 
या निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. त्या अंतर्गत सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार करतात. लहान मुले व पुरुष देखील या कार्यात सहभाग घेतात.  एकादशी पर्यंत चारही देवतांना पुर्णपणे लेपन होईल एवढी चंदनाची उटी तयार होते.मात्र यावर्षी देशाभर कोरोना व्हायरसचे तांडव सुरु आहे. यापासुन होणारा संसर्ग टाळण्यासाठी  श्री निवृत्तिनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज होणारी उटीची वारी देखील मागील वर्षाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. संचारबंदी मुळे बाहेरगावाहुन कोणीही भाविक येणार नाही. त्यामुळे पौर्णिमे पासूनच संस्थानचे पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी व त्यांचे कुटुंबिय, मंदिरातील सेवेकरी, कर्मचारी हे गेले दहा दिवसांपासुन  चंदनाची उटी तयार करीत होते. तसेच परंपरागत पध्दतीने गोसावी परिवाराने पारायण सप्ताह संपन्न केला.
 
नाथांच्या समाधीची पंचोपचारे पुजा व अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठिक दोन वाजता पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी  लावण्यास प्रारंभ करण्यात आला. योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, रश्मी गोसावी, विजय धारणे, ज्ञानेश्वरी गोसावी-धारणे आदींनी देवांना ऊटी लावली. यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे कृष्णा सोनवणे, नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव, ह.भ.प. अॅड. भाऊसाहेब गंभीरे, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.  यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला. नैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

अत्यंत फायदेशीर व्यवसाय "लसूण लागवड Garlic Farming"

मी हक्कांविषयी बोलण्यासाठी गेलो होतो; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

पुढील लेख