suvichar

पुणेकर-मुंबईकर या धबधब्यांवर जाण्यास पूर्णतः बंदी असून येथे जाणे टाळा

शनिवार, 7 जुलै 2018 (10:05 IST)
पर्यटकांची गर्दी आणि धोका लक्षात घेऊन पावसाळ्यात प्रशासनाने रायगड, कर्जत, खोपोलीतील तीन पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घातली असून ६ जुलै 2018 ते ४ सप्टेंबर 2018 कालावधीसाठी ही बंद राहणार असून येथे येण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबतीत  कर्जतच्या उपविभागीय दंडाधिका-यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार खालापूर - आडोशी धबधबा, खालापूर - आडोशी पाझर तलाव, खोपोली - झेनिथ धबधबा हे प्रमुख धबधबे येथे पूर्णतः बंदी असणार आहे.
 
या तीनही ठिकाणांवर सुट्ट्यांमध्ये पुण्या मुंबईच्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. वाहनांची गर्दी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं या ठिकाणांवर अनेक प्रश्न निर्माण होतात. वाहतूकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना ही तिनही ठिकाणं धोक्याची केंद्र ठरली आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत आणि पर्यटक सूचनांचं पालन करत नाही त्यामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कर्जमाफी योजनेत सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला

श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल, चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताकीद दिली

नाशिकमध्ये भीषण अपघात; दोन ट्रकने कारला धडक दिल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

लेह-लडाखमध्ये भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील दोन वकिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments