Dharma Sangrah

वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, चार जणांना अटक

बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (23:30 IST)
वाघाचे नखं,अवयव आणि इतर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी नागपूर वनविभागानं गेल्या दोन दिवसात चार जणांना अटक केली आहे.अगोदर नागपूर बुटीबोरी येथे कारवाई करत वनविगाच्या पथकानं दोघांना जेरबंद केले.त्यानंतर नागपूर वनविभागाने चंद्रपूर वनविभागाच्या मदतीनं पांचगाव येथून दोघांना ताब्यात घेतले. दोन दिवसांच्या या कारवाईनं नागपूर वनविभागानं या चार आरोपींकडून वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस, विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या जप्त केले आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, महाराष्ट्र वन विभागानं गेल्या आठ दिवसात वन्य प्राणी आणि त्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी 18 जणांना अटक केली आहे.              
 
बुटीबोरी वनपरिक्षेत्र कार्यलयानं 29 ताऱखेला गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत वाघाच्या 7 नखांसह महादेव आडकु टेकाम ,गोकुळदास पवार ताब्यात घेतले होते.त्यांची चौकशी केल्यानंतर चंद्रपूर वनविभागासोबत कारवाई करत पांचगाव येथून रामचंद्र आलाम, विजय लक्ष्मण आलाम यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या घरांची झडती घेतली असता वनविभागाच्या पथकाला  त्यांच्याकडे  वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, वाघाच्या कातडाचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, मोराचे पिस,  विषारी झाडांच्या बिया आणि शिकारीसाठी वापरण्यात येणार साहित्या आढळून आले.या आरोपींनी एका वाघाची शिकार केल्याचीही कबूली दिली आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राम मंदिर ट्रस्ट लवकर बरखास्त करा… संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला

LIVE: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट ६ जुलैपर्यंत जारी

सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी एक आदर्श बनला, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा दावा

IND vs ENG : इंग्लंडने भारताला चार गडी राखून हरवले

अक्षर पटेलने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला, १०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments