Dharma Sangrah

कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या

सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (06:08 IST)
कोजागरी पौर्णिमा 2025 : कोजागरी पौर्णिमा, जी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान राखणारी पौर्णिमा आहे. या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो, ज्यामुळे या रात्रीला "कोजागरी" (कोण जागे आहे?) असे नाव पडले आहे. 
ALSO READ: Ashwin Purnima 2025 आश्विन पौर्णिमा २०२५ तारीख व शुभ मुहूर्त
पौराणिक कथेनुसार, या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे कोणी जागे राहून तिची पूजा करतात, त्यांच्यावर ती कृपा करते. या रात्री जागरण आणि पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' म्हणतात कारण या दिवशी रात्री उत्तररात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर फिरत येऊन 'को जागर्ति' (कोण जागत आहे?) असे विचारते, आणि जो जार्गत असतो त्याला ती आशीर्वाद देते असे मानले जाते. 'को जागर्ति' या संस्कृत शब्दाच्या आधारावर या पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' असे नाव मिळाले आहे. 
 
कोजागिरीचे महत्त्व -
या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी कोजागिरीच्या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण जागे आहे असे विचारते. या दिवशी घराला स्वच्छ करून दीप प्रज्वलन करून दुधाला आटवून त्यात सुकेमेवे, चारोळ्या घालून रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. जेणे करून चंद्रमाच्या अमृत किरणा त्यात पडतील. त्या दुधाचा देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात. 
ALSO READ: Kojagiri Vrat Katha शरद पौर्णिमेची पौराणिक कथा
ही पौर्णिमा शरद ऋतूच्या आगमनाची प्रतीक असल्याने ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. 
या रात्री चंद्रमाचे सौंदर्य बघण्यासाठी कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात आणि चंद्रमाच्या प्रकाशात घरातील मोठ्या अपत्याचे मग ती मुलगी असो किंवा मुलगा. पाटावर बसवून औक्षण केले जाते. आणि त्यांना भेटवस्तू दिली जाते. रात्री जागरण केले जाते गाणे आणि नृत्याचा आनंद घेतला जातो. 
ALSO READ: Kojagiri Purnima 2025 Wishes कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठीत
कोजागिरीचा संबंध शेतकऱ्यांशी देखील आहे. कारण हा काळ खरीप पिकांच्या कापणीचा आहे. शेतकरी आपल्या पिकांच्या समृद्धीसाठी लक्ष्मी आणि इंद्रदेवाची पूजा करतात.
या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करताना को जागृती असे विचारते. त्यामुळे या रात्री जागरण करणे महत्त्वाचे आहे. जेणे करून देवी लक्ष्मी आशीर्वाद देते. 
चन्द्रमाचे औक्षण करून त्याला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात. 
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाण्याची प्रथा आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मानले जाते.
आयुर्वेदानुसार, या रात्री चंद्राची किरणे शीतल आणि औषधी गुणांनी युक्त असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.हा सण शरद ऋतूच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचा सण आहे. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Guru Arjan Dev तप्त तव्यावर बसवून अंगावर जळती वाळू ओतली तरी ढळली नाही श्रद्धा

Jamai Sasthi 2026 Katha जमाई षष्ठी कथा; मांजरीचा शाप आणि सुनेला पश्चात्ताप

Shri Suktam Path देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर श्री सूक्तमचे पठण करा

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments