Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवयवदान करण्यापूर्वी हा गोष्टी जाणून घ्या

Updated: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (11:47 IST)
जीवित असताना दान केले जाणारे अवयव -
* यकृत - यकृतामध्ये पुनः निर्माणाची क्षमता असते, जर यकृताचा एक भाग दान दिला तर ते वाढून पूर्ववत स्थितीत येतो.
 
* मूत्रपिंड - एका मूत्रपिंडाने देखील माणूस जिवंत राहू शकतो. म्हणून एक मूत्र पिंड दान केले जाऊ शकतात.
 
* फुफ्फुस - फुफ्फुसांचा एक भाग दान दिला जाऊ शकतो. हे यकृताच्या उलट असते, कारण फुफ्फुसांमध्ये पुनर्निर्माणाची क्षमता नसते.
 
* स्वादुपिंड - याचा क्रियाशीलतेला लक्षात घेता, अग्नाशयचा किंवा स्वादुपिंडाचा एक भाग दान करू शकतो.
 
* आंतड्या - दुर्मिळ प्रसंगी देणगीदारांच्या आतड्याचा एक भाग दान दिला जाऊ शकतो.
 
* कोण अवयव दान करू शकत नाही -
कर्करोग आणि एचआयवीने ग्रस्त व्यक्ती आणि सेप्सीस (सडलेल्या जखमा) किंवा इंट्राव्हेन्स (आयव्ही) औषधे वापरणारे व्यक्ती सक्रिय संसर्गामुळे आपले अवयव दान करू शकत नाही. पण मृत शरीरातून अवयव आणि उती काढल्या जाऊ शकतात.
 
* मूत्रपिंड - प्रत्यारोपण केलेले मूत्रपिंड 9 वर्ष काम करतो.
 
* यकृत - एका यकृतात पुनर्निर्माण करण्याची क्षमता असते हे काढल्यावर दोन माणसांमध्ये प्रत्यारोपित केले जाऊ शकते. म्हणजे एका यकृताचा फायदा दोन लोक घेऊ शकतात.
 
* फुफ्फुसे - एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना प्रत्यारोपित केले जाऊ शकते.
 
* स्वादुपिंड, आंतड्या, रक्तवाहिन्या, रक्त आणि प्लेटलेट्स ऊतक -हे अवयव मृत्यू झाल्याच्या 24 तासांत दान केले जाऊ शकते.
 
* कॉर्निया - कॉर्निया हे मृत्यू झाल्याच्या 24 तासातच दान करता येतो असे म्हणतात की एक मृत माणसाचा कॉर्निया दोन अंध लोकांच्या आयुष्याला उजळवू शकतो.
 
* हाडे, त्वचा, शिरा, टेण्डन, अस्थिबंधन, हृदयाचे व्हॉल्व, कार्टिलेज किंवा कूर्चा - देणगी दाराच्या शरीरातून काढलेले हे अवयव 6 ते 72 तासाच्या आतच प्रतिस्थापित केले पाहिजे.
 
तर कॉर्निया, त्वचा, हृदयाचे व्हॉल्व्ह, हाडे, टेण्डन, अस्थिबंधन आणि कार्टिलेज सारखे ऊतक किंवा उती नंतर उपयोगात घेण्यासाठी संरक्षित आणि संग्रहित केले जाऊ शकते.
 
* वयोमर्यादा- सामान्य आरोग्य असणारी कोणतीही व्यक्ती आपल्या अवयवांना दान करू शकते.
 
अवयव दान करण्याची प्रक्रिया -
* आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या अवयवांना दान करण्याची प्रतिज्ञा घेऊ शकतो. या साठी त्यांना देणगी कार्ड प्रदान केले जाते. 
 
* अवयवांना दान करण्याच्या वेळी व्यक्तीकडे देणगी कार्ड असणे आणि आपल्या कुटुंबीयांना माहिती देणे बंधन कारक आहे.
 
* मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या बाबतीत, अवयव दान करण्याच्या नियमांसह मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा बनविला आहे. या कायद्या मध्ये ठरविलेल्या कार्य पद्धतीच्या व्यतिरिक्त, कायदेशीर अधिकाऱ्याला अवयव काढण्याच्या पूर्वी कुटुंबाची परवानगी आणि कोरोनरची आवश्यकता असते. कायदेशीर औपचारिकता असलेल्या प्रक्रियेत, रुग्णाला व्हेंटिलेटर वर जिवंत ठेवतात. 
 
* अशा रुग्णांचे जवळचे नातेवाईक त्याच्या अवयवांना दान करू शकतात.
 
भारतात अवयवदान दिवस -
एका अध्ययनावरून आढळलेले आहे की भारतात दरवर्षी अवयवांचे कार्य न करणे आणि अवयवांच्या कमी उपलब्धते मुळे सुमारे 5 लाख लोकांची मृत्यू होते. अवयवदान दिवस किंवा अंगदान दिवस हे विविध लोक, सरकारी आणि स्वयंसेवी संस्था आणि इतर बऱ्याच संस्थांद्वारे साजरा केला जातो. या संस्था लोकांमध्ये अवयव दानाचे महत्त्व सांगून आणि जागरूकता निर्माण करून त्यांना अवयवदानाकडे प्रवृत्त केले जाते. असे म्हणतात की एक अवयवदाता सुमारे 8 लोकांचे आयुष्य वाचवू शकतो. या साठी आपण ऑनलाईन नोंदणी करू शकता. किंवा खालील संस्थेमध्ये अवयवदान करू शकता. 
 
* मोहन फाउंडेशन
* गिफ्ट योर ऑर्गन फाउंडेशन
* शतायु
* उपहार एक जीवन
 
चला तर मग ही वेळ आहे जुन्या मिथक कहाण्यांना विसरून, विज्ञानावर विश्वास ठेवून संकटात असलेल्या गरजूंना मदत करण्याची. ही जाणीव करण्याची की आपण जिवंत पणे तर सर्वांची मदत करतोच, तर मृत्यू पश्चात देखील कोणाच्या कामी येण्याची प्रतिज्ञा करू या. 
 
अवयव दान करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा -
* अवयवदान हे मेंदूच्या मृत्यूच्या बाबतीतच होते जे एखाद्या माणसाच्या मृत्यू पश्चात रुग्णालय घोषित करते.
 
* हेच ते रुग्णालय असते जेथे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू होते. हे कार्य त्याचे सल्लागार, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आणि डॉक्टरांच्या पर्यवेक्षण खाली केले जाते.
 
* आपण अवयवदान देण्याची इच्छा बाळगत असाल तर या स्थितीत आपल्याला संस्थेमध्ये नोंदणी केल्यावर एक कार्ड दिले जाते. जे दर्शवतात की आपली अवयव दान करण्याची इच्छा आहे.
 
* असे आवश्यक नाही की ज्या संस्थेला आपण अवयवदान करू इच्छित आहात, त्या संस्थेला या प्रक्रिया संबंधी योग्य माहिती आहे. 
 
* मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये रुग्णालय कुटुंब आणि डोनरच्या सल्लागाराशी संपर्क साधून कुटुंबाचे मत जाणून घेतो.
 
* भारतात सध्या डोनरच्या कुटुंबाचे लोक ठरवतात की ते अवयवदान करू इच्छित आहे किंवा नाही. एवढेच नव्हे तर आपण जरी अवयवदान करण्याचे वचन दिले असेल तरी ही कुटुंबाच्या परवानगी शिवाय अवयवदान केले जाऊ शकत नाही.
 
* अवयव दाता कुठे ही नोंदणी करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयाशी चर्चा करणे आवश्यक आहे. जेणे करून ते आपल्या मृत्यूपश्चात आपली इच्छा पूर्ण करू शकतील.
 
* बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की कुटुंबीयांनी व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात देखील अवयव दान करण्यास नकार दिला, कारण त्या व्यक्तींनी या संदर्भात कधीच सांगितले नव्हते. अशा परिस्थितीत अवयवदान करण्याचा निर्णय घेणं अवघड असतं.
 
* अवयवदानासाठी नोंदणी करणे आणि डोनरकार्ड मिळविण्याचा अर्थ असा नाही की आपण कायद्याचा चौकटीत आला आहात. ही निव्वळ आपली इच्छा आहे. आपणास हे कार्ड कुठून मिळाले आहे याने काहीच फरक पडत नाही.

* हे कार्ड फक्त एक प्रतीक आहे की आपण अवयवदान करण्यास इच्छुक आहात. म्हणून हे आपल्या जवळ बाळगा आणि आपली अवयव दान करण्याची इच्छा आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

गुडघ्याच्या दुखापतीमुळे यानिक सिनर स्पर्धेतून बाहेर

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री

साईराज बहुतुले यांनी शुभमन गिलच्या दुखापतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली

UPI ​​व्यवहार शुल्काबाबत अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण: सर्वसामान्यांसाठी P2P व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार!

झारखंडमध्ये भरती परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन पेटले

पुढील लेख
Show comments