गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (22:05 IST)

IND vs PAK Super 4: मोहम्मद कैफने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले

आशिया चषक 2022 च्या सुपर 4 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेटने पराभव झाल्यानंतर आता संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी भारताला पाकिस्तानकडून पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, निवडकर्त्यांनी आशिया कप 2022 साठी अतिरिक्त वेगवान गोलंदाज न खेळवून मोठी चूक केली आहे.अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही संघात असायला हवा होता, असे कैफचे मत आहे. 
 
"भारताने आशिया कप संघाची निवड करताना अतिरिक्त वेगवान गोलंदाज न निवडून चूक केली आहे. अर्शदीप नवीन आहे आणि प्रथमच उच्च दाबाची स्पर्धा खेळत आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघही आहेत," असे कैफने सांगितले. 
 
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतरही, टीम इंडियाने आशिया चषक 2022 साठी 15 सदस्यांच्या संघात केवळ तीन आघाडीच्या वेगवान गोलंदाजांची निवड केली, ज्यात चौथा पर्याय म्हणून अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील आहे.निवडकर्त्यांनी शमीचा संघात समावेश केला नाही आणि अनुभवी भुवनेश्वर कुमारला पाठिंबा देण्यासाठी अर्शदीप सिंग आणि आवेश खानला संघात घेतले. 
 
माजी फलंदाज पुढे म्हणाले , "त्याच्याकडे क्षमता आणि प्रतिभा आहे, परंतु अनुभव नाही. तो अधिकाधिक सामने खेळेल तेव्हा तो अधिक शिकेल. म्हणूनच मला वाटते की भारताला त्यांच्या संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची गरज आहे.