संबंधित माहिती
- श्रीलंकेचं हे आर्थिक संकट इतकं गडद आहे की...
- संसद पावसाळी अधिवेशन : 'तानाशाह', 'जुमलाजीवी', 'नौटंकी,' असंसदीय शब्दांच्या नव्या यादीवरून देशात गदारोळ
- महाराष्ट्र पाऊस : पुणे, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
- अश्विनी भिडेः 'मेट्र्रो वुमन' ओळख असलेल्या या IAS अधिकारी कोण आहेत?
- हमीद अन्सारीः पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्यानंतर माजी उपराष्ट्रपतींवर टीका का होतेय?
दोन मुलंच जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही - ओवैसी
देशात वाढत्या लोकसंख्येवरून वाद सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी एक विभाग करीत आहे. दरम्यान, 'दोनच मुले जन्माला घालण्याची मर्यादा ठरवणाऱ्या कोणत्याही कायद्याचं समर्थन करणार नाही', असे एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
"आपण चीनसारखी चूक करायला नको. यातून देशाला फायदा होणार नाही. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिमांना जबाबदार धरू नका," असंही ओवैसी म्हणालेत.
'कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढल्याने अराजकता निर्माण होईल. यामुळे लोकसंख्येचा असमतोल व्हायला नको', असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना ओवैसींनी म्हटलं की, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर करणारे मुस्लिम आहेत,' असं त्यांचे आरोग्यमंत्रीच सांगतात.
उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय प्रजनन दरात घट दिसून येते. भारताचा प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे. 2030 पर्यंत स्थिरता दिसेल. चीनची चूक आपण इथे पुन्हा करू नये, असंही असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आहे.