Dharma Sangrah

पावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

मंगळवार, 24 जुलै 2018 (14:57 IST)
पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंदघ्यायचा असतो. जर तुम्हीही अशाच काही खास ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगत आहोत. 
 
कोडायकनाल
तमिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. 
 
देवरियाताल
मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी. 
 
मुन्नार
केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता. 
 
बिष्णुपूर
पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनुभव देतील. 
 
जीरो
अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही. 
 
उदयपूर
उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोहक वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

ताल'च्या सिक्वेलवर सुभाष घई यांनी संकेत दिले, चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी प्रशंसा केली

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

पुढील लेख
Show comments