गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Updated : शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (10:42 IST)

राजीव गांधी जयंती विशेष 2021 :राजीव गांधी जीवन परिचय

जन्म - 20 ऑगस्ट, 1944
मृत्यू - 21 मे 1991
 
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. भारत स्वतंत्र होण्यास अजून तीन वर्षे बाकी होते. ते असे पंतप्रधान होते ज्यांनी स्वातंत्र्य संग्राम बघितले नाही .या स्वातंत्र्याच्या लढा मध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सहभागी होते. राजीव गांधींच्या जन्माच्या वेळी, त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते.त्यांची आई इंदिरा गांधी स्वतः 15 महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटल्या होत्या आणि वडील फिरोज गांधी फक्त एक वर्षापूर्वीच तुरुंगातून निघाले होते.
 
राजीव गांधींनी त्यांचे बालपण त्यांच्या आजोबांसोबत तीन मूर्ती हाऊसमध्ये घालवले, जिथे इंदिरा गांधींनी पंतप्रधानांच्या परिचारिका म्हणून काम केले. ते काही काळ डेहराडूनच्या वेल्हम शाळेतही गेले पण लवकरच त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दून शाळेत पाठवण्यात आले. शाळा सोडल्यानंतर राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज मध्ये गेले, पण लवकरच ते लंडनच्या इम्पीरियल कॉलेज मध्ये गेले, जिथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
 
केंब्रिजमध्ये, जिथे राजीव शिक्षण घेत असे, ते अतिशय शांत होते आणि ते पंतप्रधानांचा मुलगा आहे हे देखील कोणालाच माहित नव्हते. एकदा माहिती मिळाल्यावर त्यांना सांगावे लागले की त्यांचा महात्मा गांधींशी काही संबंध नाही.ते तर पंडित नेहरूंचे नातू आहे हे कोणाला कळाले नाही,म्हणून इतर विद्यार्थ्यांप्रमाणे, कधीकधी त्यांनाही आर्थिक अडचणीतून जावे लागले. त्यांना सुट्ट्यांमध्ये  बेकरीमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागायचे,फळे उचलणे, आइस्क्रीम विकणे, ट्रक लोड करणे असे काम करावे लागायचे.
 
राजीव गांधींचे लग्न अँटोनिया माईनो शी झाले होते, त्या इटलीच्या नागरिक होत्या . लग्नानंतर अँटोनियाने तिचे नाव बदलून सोनिया गांधी ठेवले.असे म्हटले जाते की राजीव गांधी जेव्हा अँटोनियाला भेटले तेव्हा ते केंब्रिजमध्ये शिकण्यासाठी गेले होते. राजीव गांधी यांचे 1968 मध्ये लग्न झाले, राजीव आणि सोनिया गांधी यांना 2 मुले आहेत, मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी.
 
इंदिरा गांधींचे पुत्र आणि पं.जवाहरलाल नेहरू यांचे नातू असल्याने, लहानग्या  राजीवचे बालपण सत्तेच्या आभाभोवती वाढले. राजकारणी आणि मुत्सद्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करण्याची त्यांना पुरेपूर संधी मिळाली. जरी त्यांनी स्वत: सत्तेवर येण्याची कधी कल्पना केली नसली तरी त्यांना संजय गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई इंदिरा गांधींना राजकीय पाठिंबा देण्यासाठी अनिच्छेने भारतीय राजकारणात प्रवेश करावा लागला. मग एक दिवस असाही आला की आईच्या मृत्यूनंतर सक्रिय राजकारणात येऊन त्यांना  राजकारणात प्रवेश करावे  लागले.राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधी इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते.
 
राजीव गांधी हे एक तरुण पंतप्रधान होते ज्यांनी समाजातील सर्व घटकांवर प्रचंड प्रभाव पाडला होता. या राजकीय यशाचे कारण म्हणजे राजीव गांधींना त्यांचे वडील फिरोज गांधी यांच्याकडून 'आपले काम स्वतः करा' अशी प्रेरणा मिळाली. राजीव जी म्हणायचे की ते त्यांचे आजोबा पंडित नेहरू 'आराम हराम है' आणि वडील फिरोज गांधी 'श्रमाचे महत्त्व आणि संकोच न करता सत्य बोलणे' पासून प्रेरित झाले होते. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा छंद मिळाला, तर त्याआधी त्यांच्या आईला वाटले की नेहरू लोक संगीत प्रेमी नसतात.
 
ऑक्टोबर 1984 चा तो शेवटचा दिवस होता. मतदानपूर्व वातावरणात दिल्ली बुडाली होती. इंदिरा गांधींनी दोन महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी त्यांना टीव्हीसाठी मुलाखत द्यायची होती. इंदिरा गांधी आपल्या 1, सफदरजंग रोड येथील निवासस्थानातून 1, अकबर रोड येथे त्यांच्या  कार्यालयासाठी निघालेल्या असता त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बेशुद्धआणि घायाळ अवस्थेत त्यांना आर.के. धवन आणि सोनिया गांधी यांनी कारने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये नेण्यात आले पण त्यांना वाचवता आले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी राजीवजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
 
राजीव गांधी अत्यंत उदार स्वभावाचे होते. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली होती, त्यामुळे त्यांना राजकारणात प्रवेश करावा लागला. 31 ऑक्टोबर 1984 रोजी आई इंदिराजींच्या हत्येनंतर जेव्हा राजीव गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा ते जगाच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. 1984 मध्ये ते इंकाचे अध्यक्ष झाले. राजीव गांधींना सत्तेचा प्रत्यक्ष अनुभव नसला तरी त्यांना अप्रत्यक्षपणे सखोल अनुभव होता. इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या 13 व्या दिवशी, त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या अस्थी त्यांच्या मुलाने हिमालयात विखुरल्या.
 
त्याच दिवशी राजीव गांधींनी रेडिओ आणि दूरदर्शनवर राष्ट्राला संदेश दिला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्राचा स्वाभिमान व्यक्त करणारे हे त्यांचे पहिले धोरण संबोधन होते. या भाषणात राजीव गांधींच्या राजवटीच्या मूलमंत्रा  व्यक्त करण्यात आले - 'एकत्रितपणे आपल्याला एक भारत बनवायचा आहे जो 21 व्या शतकातील आधुनिक भारत बनेल'. आज आपण ज्या भारतात श्वास घेत आहोत,  आधुनिक भारताच्या शक्तीला  जे आज संपूर्ण जग स्वीकारत आहे. ज्या भारतावर आज संपूर्ण जगाची दृष्टी आहे.तोच भारत  उद्याची जागतिक शक्ती बनेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.असे मानले जात आहे आणि असे म्हटले जात आहे की पुन्हा एकदा भारत संपूर्ण जगाला एक नवा मार्ग दाखवेल, ती राजीव गांधींची भेट आहे. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते.
 
21 मे 1991 रोजी श्रीपेरंबुदूर येथे एलटीटीईने केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी हे पद भूषवले. भारतात संगणक क्रांती आणणारे राजीव गांधी हे नेहरू-गांधी घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे सदस्य होते. राजीव यांना  देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा अभिमानही मिळाला आहे
 
त्यांच्या कार्यकाळातील सर्वात वाईट गोष्ट बोफोर्स कांड झाला .त्या मध्ये त्यांची बदनामी तर झालीच.या मुळे त्यांच्या हातून सत्ता गेली.