Festival Posters

नजर : अप्रतिम नजराणा !

Updated: शनिवार, 1 एप्रिल 2023 (17:54 IST)
किती समर्पक भावना आहेत. आज प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या चिंतेच्या चितेवर जळत असतो. जसे प्राण्यांना स्वछंदी जीवन जगता येते तसे मानवाला जगता येत नाही कारण तो विकृत स्पर्धेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. हे चक्रव्यूह भेदून तो जेव्हा बाहेर येईल तो खरा त्याच्या आनंदी, समाधानी जीवनाचा प्रारंभ असेल. भौतिक सुखांचा डोंगर सभोवताली असेल पण त्या सुखाभोवती भांडणे-तंटे, हेवेदावे, असूया, छोट्या छोट्या गोष्टींचे नैराश्य अशा नकारात्मक पायऱ्या असतील तर मानव तो डोंगर चढू शकणार नाही.
 
चिमणीचा संदेश घेऊन पुढे डोकावणाऱ्या वाचकांच्या स्वागतासाठी आषाढ मास सज्ज आहे. आषाढ महिना आला की, अनेक गोष्टी आठवतात. त्या सांगून लेखिका एका मानवीय गुणधर्माकडे हळूच लक्ष वेधते तो म्हणजे मनुष्य देवाजवळ नेहमी, सतत काही ना काही मागत असतो. आषाढाचे अनेक गुणधर्म सांगताना जणू आषाढ म्हणतो,
'देव आता झोपणार, तुमची संकटे, तुमचे प्रश्न आता तुम्हीच सोडवा, निदान प्रयत्न तरी करा...' ऋचा असा समाजोपयोगी संदेश अनेक ठिकाणी देतात.
 
'प्रेम' शब्द उच्चारला की, ऐकणारांच्या समोर एक वेगळीच छबी उभी राहते. प्रश्नांचे वाटोळे गरगरत राहते परंतु प्रेमाच्या चौकटीच्या बाहेर जागोजागी प्रेम आहे. ही अशी नाती आणि त्यातील प्रेमळ संबंध लेखिकेने खूप सुंदरतेने व्यक्त केले आहेत.
 
संक्रांत म्हटलं की, महिला प्रफुल्लित होतात. खरेदीची लगबग सुरू होते. साडी, वाणाचे नि खाण्याचे सामान अशा बाबींची यादी नि चर्चा सुरू होते. परंतु लेखिका ऋचा कर्पे यांची संक्रांतीकडे पाहण्याची नजर थोडी हटके आहे... ती वक्र नाही. 'संक्रांत वही, वजह नई' लेखाच्या अशा शीर्षकातून लेखिकेचा नवविचार लक्षात यावा. ऋचा जी की नई वजह क्या है, यह जानने के लिए यह लेख पढ़ना जरुरी है।
 
काही दशकांपूर्वी घराघरांतून 'शुभं करोति कल्याणम्' आणि इतर प्रार्थनांचे सूर कानी पडत असत परंतु आजकाल हे स्वर हरवले की काय असे वाटत असतानाच लेखिकेचा वेगळा, सकारात्मक दृष्टिकोन लेखात वाचायला मिळतो.
 
कृष्ण! सर्वांचा तारणहार, सखा! 'कृष्ण समजलाच कुठे आपल्याला' या लेखात लेखिका कृष्णाची विविध रुपे सांगतात नि लिहितात, एखादे संकट समोर आले, द्वंद्व सुरू झाले की, डोळे मिटताच कृष्णाची छबी समोर येते, हात आपोआप जोडून आपण धावा करतो आणि मार्ग सापडतो. कारण कृष्ण सांगतो, जेव्हा समस्या येते तेव्हा त्यासोबत एक उपाय सुद्धा जन्माला येतो...' असे सांगून लेखिका भक्तीभावाने कृष्णाची महती सांगताना कृष्ण आपल्याला समजलाच नाही अशी चर्चाही करतात.
 
अनेकविध विषयांवर लिहिताना ऋचा 'भारत माता की जय' या लेखात तिरंगा झेंड्याची महती गातात. नुकताच आपण 'हर घर तिरंगा...' हा कार्यक्रम साजरा केला. यासंदर्भात मनमोकळी चर्चा ऋचा यांनी केली असून अनेक उदाहरणे देऊन तिरंग्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. 'हर घर तिरंगा ' या कार्यक्रमास ज्यांनी विरोध केला त्यांनी हा लेख आवर्जून वाचायलाच पाहिजे.
 
भुलाबाई! आज स्पर्धेच्या आणि विभक्त कुटुंबपद्धती शिवाय शहरीकरणाच्या नादात जुन्या काळातील संस्कारक्षम गाणी, खेळ, संवाद हरवत चालले असताना ऋचा कर्पे यांनी अत्यंत विस्तृतपणे, वेगवेगळी उदाहरणे, गीतांचा संदर्भ देऊन लिहिले आहे. ज्यांनी हे सारे अनुभवले आहे, पाहिले आहे त्यांना ऋचा निश्चितच रम्य भूतकाळात घेऊन जातात.
 
केव्हा तरी पहाटे... हे शब्द कानी पडताच काही छान गाणी आठवतात. ऋचा यांनी लेखात 'पहाट' हा शब्द घेऊन पहाटेची विविधांगी रूपे वाचकांपुढे उभी केली आहेत.
 
'राधेय' ही कादंबरी ऋचा यांची आवडती कादंबरी आहे. ह्या कादंबरीवर भाष्य करताना लेखिका 'राधेय'चे लेखक रणजीत देसाई यांचे एक सुंदर वाक्य उद्धृत करतात...
 
'प्रत्येकाच्या मनात दडलेला एक कर्ण असतो... आपल्या मनाची चार पाने उलटली तर हा कर्ण दिसेल...' यावरून ऋचा यांचे वाचन किती सखोल आहे याची प्रचिती येते.
 
बाप्पा! आबालवृद्धांना प्रिय असा! बाप्पाचे आगमन म्हणजे एक महोत्सव! आनंदोत्सव! अनेक दशकांपासून गणेशोत्सव सुरू आहे. बदलत्या काळानुसार ह्या महोत्सवाचे स्वरुप ही बदलत गेले. नेमकी हीच बाब हेरून लेखिकेने विस्तृत माहिती दिली आहे.
 
लेखिका ऋचा कर्पे जशा भुलाबाई खेळात रमतात तशा त्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही पूरेपूर वापर करताना टैक्नोफ्रेंडली होणे ही काळाची गरज आहे हे ठामपणे मांडतात. टैक्नोफ्रेंड ही नवीन संकल्पना मांडताना त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांनी टिपलेले सामाजिक बदल वास्तव आहेत. कविवर्य मंगेशकर पाडगावकर हे ऋचा यांचे आवडते कवी असावेत कारण अनेक लेखांमधून त्यांनी कविवर्यांच्या कवितांच्या ओळी उद्धृत केलेल्या आहेत. या आस्वादकात्मक लेखाचा शेवटही त्यांनी उद्धृत केलेल्या ओळी वाचून करु.... कवी पाडगावकर...
आपण ओढ लावल्याखेरीज, पाणी नसतं आपलं,
कोऱ्या कोऱ्या कागदावर असल जरी छापल,
ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं... 

मलाही ह्या ओळी वाचताना वाटले.. सुचले ते असे...
  पुस्तक झालं जरी वाचून
  प्रतिक्रिया दिल्याखेरीज
  लेखकाच मन येत नसतं भरून 
ऋचा कर्पे यांची भाषा साधी, सोपी, रसाळ आहे. त्यामुळे समजायला अवघड जात नाही. सारे लेख छोटे छोटे आहेत त्यामुळे कंटाळवाणे होत नाहीत. अनेक लेखांमध्ये नवीन काही तरी असल्याने ते वाचनीय नि काही शीर्षकांमुळे उत्कंठावर्धक आहे. आगामी लेखनास भरपूर शुभेच्छा!
                  
नजर :     लेखसंग्रह
लेखिका: ऋचा दीपक कर्पे
प्रकाशक: शॉपिज़न. ईन
पृष्ठसंख्या: ७०
किंमत:      ₹२२७/- 
आस्वादक: नागेश सू. शेवाळकर
                  पुणे
                  (९४२३१३९०७१)

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments