गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (11:06 IST)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 8418 नवीन प्रकरण, 24 तासांत आणखी 171जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे  8418 नवीन प्रकरण झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूमुळे 171 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन घटनांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे. मंगळवारी एकूण 10,548 लोक बरे झाले आहेत.
 
विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, 8 हजाराहून अधिक नवीन रुग्णांसह संक्रमित लोकांची एकूण संख्या 61,13,335 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 58,72,268 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 171 लोकांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकूण मृतांचा आकडा1,23,531 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या अद्याप 1,14,297 आहे.
 
 
मुंबईत 453 नवीन प्रकरणे
 
मंगळवारी मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 453 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून, 9 फेब्रुवारीपासून दररोजच्या घटनांमध्ये ही सर्वात कमी घटना घडल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले की, दुसर्‍या दिवशी साथीच्या आजारामुळे आणखी 10 रुग्णांचा मृत्यू झाला.बीएमसीच्या आकडेवारीनुसार नवीन प्रकरणे आल्यानंतर एकूण प्रकरणे 7,25,620 वर गेली आहेत आणि मृतांचा आकडा 15,564 वर पोहोचला आहे. सध्या कोविड -19 चे 7,908 रुग्ण मुंबईत उपचार घेत आहेत. 
 
ठाण्यात 445 नवीन प्रकरणे
 
त्याच वेळी, ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 445 नवीन घटनां समोर आल्यानंतर  इथे संक्रमितांची एकूण संख्या 5,34,897 वर गेली आहे. मंगळवारी एका अधिका्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की संक्रमणामुळे आणखी 11 रुग्णांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात मृतांचा आकडा 10,755 झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण 2.01 टक्के आहे. उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या आणि संसर्गातून बरे झालेल्या रूग्णांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
 
नाशिकमध्ये 124 नवीन प्रकरणे
 
नाशिक जिल्ह्यात कोविड -19 चे 124 नवीन रुग्ण आल्यानंतर इथल्या संक्रमित लोकांची संख्या 3,95,354 पर्यंत वाढली आहे, तर संक्रमणामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात 8,385 लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत ही माहिती देताना आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी संसर्गाचे नवीन रुग्ण आढळले. ते म्हणाले की, नाशिकमधील संसर्गातून आतापर्यंत 3,84,965 लोक बरे झाले आहेत.