संबंधित माहिती
- कोरोना नियमांचे उल्लंघन; 18 हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार, बिअर शॉपी पोलिसांकडून सील
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मध्ये मुलांची काळजी अशी घ्या -तज्ञांचा सल्ला
- Ganga Saptami 2021: 18 मे गंगा सप्तमी, आरोग्य, यश आणि सन्मानासाठी हे खास 8 उपाय
- Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय
- BSNL ची उत्तम रिचार्ज योजना, 180 दिवसांची वैधता, 90 GBडेटा आणि विनामूल्य कॉलिंग
राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात २० हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी हा आकडा कमी झाला. रविवारी राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. रविवारी २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात रविवारी ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुढील लेख
