संबंधित माहिती
- राज्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण
- राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईन
- भारत-चीन सीमा वाद : चीनच्या षडयंत्रला बळ मिळेल, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी करू नये - डॉ. मनमोहन सिंग
- जेव्हा झोपल्यावर कोरोना झोपतो तर मृत्यूनंतर मरतो...पाकिस्तानचा Coronavirus वर ज्ञान जाणून हैराण व्हाल
- राज्यात ६०,१४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२.४२ टक्के
राज्यात ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधी तील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.
