Dharma Sangrah

गौरीचे आवाहन कसे करावे? महापूजा आणि विसर्जन विधी देखील जाणून घ्या

Updated: सोमवार, 1 सप्टेंबर 2025 (08:14 IST)
 
गौरीचे आगमन: शुभ मुहूर्तात गौरीची मूर्ती घराच्या उंबऱ्यातून आत आणा. ज्या स्त्रीच्या हातात मूर्ती असेल, तिचे पाय दूध आणि पाण्याने धुवा. कुंकवाचे स्वस्तिक काढा. गौरीला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने स्नान घालून शुद्ध करा.

दरवाज्यापासून गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे (रांगोळीने) काढा आणि प्रत्येक पावलावर थांबवत मूर्ती आणा.
 
ताट-चमचा किंवा घंटा वाजवून गजर करा. घरातील समृद्धीची जागा (धान्य, दूध इ.) दाखवून आशीर्वाद मागा.
 
गौरीला आत आणत असताना "गौरीई आली माझ्या घरी सोन्याच्या पावलांने..." किंवा आली गवर आली सोनपावली आली किंवा पारंपरिक गाणी गा.
 
स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा:
 
गौरीला आसनावर (धान्याच्या राशीवर किंवा उतरंडीवर) विराजमान करा.  मूर्तीला हात लावून प्राणप्रतिष्ठा करा: "अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु । अस्यै प्राणाः क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेत्विचकच्चन ।।" गौरीला हळदीकुंकू लावून, नवीन वस्त्र, अलंकार घाला आणि फुलांचा हार अर्पण करा. 
 
अक्षता वाहा आणि म्हणा, "'श्री गौरी माते, तुझ्या कृपा आशीर्वाद असू दे...माझ्या घरकुटुंबाच्या कल्याणासाठी, यशासाठी आणि आमचे सर्व मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ति मिळालेल्या उपचारानी मी तुझी पूजा करीत आहे. सोन्याच्या पावलांनी तूं माझ्या घरी आली आहेस. तू आनंदाने राहा असे म्हणत नमस्कार करावा. 

प्रारंभिक पूजा: स्वतःच्या कपाळाला कुंकू लावा, घरातील देवतांची पूजा करुन नमस्कार करा.
आचमन: "ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । ॐ गोविंदाय नमः ।" म्हणून पाणी प्राशन करा.
गणपती पूजा: गणपती मूर्तीवर अक्षता, फुले, गंध, दुर्वा, जानवे वाहा. उदबत्ती आणि निरांजन ओवाळा. 
मंत्र: "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥"
कलश, घंटा आणि दीप पूजा: गंध, अक्षता, फुले वाहा. 
मंत्र: "अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत पुण्डरीकाक्षं आत्मानं च प्रोक्षेत॥"
नैवेद्य: संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवून तिचे स्वागत करण्याची पद्धत आहे. 
 
मुख्य पूजन विधी (दुसरा दिवस)
ज्येष्ठा नक्षत्रावर सकाळी गौरी आणि महालक्ष्मीची पूजा करा. आरती करून फराळ (रव्याचे लाडू, बेसन लाडू, करंजी इ.) दाखवा. महानैवेद्यात १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, पुरणपोळी, ज्वारीची आंबील, अंबाडीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, भजी, पापड, लोणचे, पंचामृत इ. केळीच्या पानावर ठेवा. सवाष्णीला जेवायला बोलवा. संध्याकाळी पुन्हा आरती करा. महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम करा. काही ठिकाणी रात्री झिम्मा-फुगड्या खेळ खेळले जातात.
 
देवीची पूजा करुन म्हणावे - 'हे गौरी माते, आम्ही यथाशक्ती आणि भक्तीभावाने विधीवत पूजा केली असून अधिक उणें असेल ते पूर्ण करून घ्यावे. तुझ्या चरणीं आमची प्रार्थना आहे की आमच्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे. आमची सर्व संकटे दूर व्हावी, आम्हाला तुझे कृपेने धनधान्य, आरोग्य, संतती- संपत्ती, सुख- समाधान लाभो. तुझी कृृृपा आमच्या अशीच राहावी. तुझ्या  कृृृृृपेने सर्व मनोकामाना पूर्ण व्हाव्यात. श्री गौरी माहात्म्य वा कथा वाचन करावे. गौरीची आरती करावी.
 
'गौरीमाते, आमच्या सर्व इच्छांची पूर्ति कर आमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण कर आम्हाला कल्याण प्राप्त होवो अशी प्रार्थना करुन फुले घेऊन श्री गौरीला अर्पण करावी.
ॐ तत्सत ब्रह्मार्पणमस्तु ।। इति श्री गौरी पूजाविधि ।।
 
विसर्जन विधी (तिसरा दिवस)
देवीला खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून आरती करा. मुखटे हलवा, खडे असल्यास नदीत विसर्जित करा. परत येताना नदीची माती घरी आणून समृद्धीसाठी पसरवा. धाग्याची गाठ (हळद, कुंकू, सुकामेवा, दिवेफळ, फुले इ. बांधून) तयार करा आणि विसर्जन करा.
 
महत्त्व आणि परंपरा
गौरी हे शिवशक्तीचे रूप आहे; पूजनाने समृद्धी येते. अग्निपुराणात सामूहिक पूजनाचा उल्लेख आहे. काही घरांत गौरीला एकटी किंवा गणपतीसोबत पूजतात. महिलांनी विशेषतः हा सण साजरा करतात.

टीप: विधी करताना पंडित किंवा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने करा. हे शास्त्रशुद्ध असावे. ही माहिती विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे. काही फरक असल्यास स्थानिक रूढी पाळा.

सर्व पहा

लग्नापूर्वी हळद का लावली जाते? या विधीचा खरा अर्थ जाणून घ्या

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments