Dharma Sangrah

भीष्माने युधिष्ठिराला सांगितलेल्या खास गोष्टी, आपल्या आयुष्यात कामी येतील

Updated: गुरूवार, 2 जुलै 2020 (12:11 IST)
 
16 या जगात इच्छा पूर्ण करून सुख मिळतं आणि जे सुख परलोकात मिळतं, ते या सुखाचा सोळावा अंश देखील नाही. जे आपल्या वासनांपासून मुक्त झाल्यावर मिळतं. ज्यावेळी माणूस आपल्या इच्छांवर वासनांवर आवर धरतो, जसे की एक कासव आपल्या अंगाला आत ओढतो, तेव्हाच आत्म्याचा प्रकाश आणि महत्त्व दिसतं. जो माणूस स्वतःला वश करण्यासाठी इच्छुक असतो त्याला लोभ आणि आसक्तीपासून लांबच राहावं.
 
17 मृत्यू आणि अमरत्व - हे दोन्ही मानवाच्या अधीन आहे. आसक्तीचे फळ म्हणजे मृत्यू आणि सत्याचे फळ अमरत्व आहे. या जगाला वृद्धावस्थेने सर्व बाजूने वेढले आहे. मृत्यू हल्ला करीतच आहे. दिवस आणि रात्र येत-जात आहे तरी ही अजून तुला जाग कशी येत नाही ? उठ वेळेला सरू देऊ नकोस. आपल्या हितासाठी काही तरी कर. आपले कर्तव्य संपत नाही की मृत्यू आपल्याला घेऊन जाते.
 
18 स्वतःचा इच्छेनुसार निर्धनता पत्करणे सुख असे. हे माणसासाठी फायदेशीर आहे. यामुळे माणूस संकटापासून वाचतो. जो या मार्गावर चालतो त्याचे कोणीही शत्रू बनत नाही. हा मार्ग जरीही अवघड असला तरीही चांगल्या माणसांसाठी हा सोपा आहे. ज्या माणसाचे जीवन शुद्ध आहे आणि याचा व्यतिरिक्त त्याची काही संपत्ती नाही, त्यासारखा दुसरा कोठेही अद्यापि मला दिसत नाही. मी तूळच्या एका भागावर निर्धनता ठेवली आणि दुसऱ्या भागावर राज्य ठेवले. निर्धनताच भाग मला जड दिसला. श्रीमंत माणूस नेहमीच घाबरलेला असतो, जणू मृत्यूने त्याला डांबून ठेवले आहेत.
 
19 त्याग केल्या शिवाय काहीही मिळत नाही. त्याग शिवाय आदर्शाची सिद्धी मिळत नाही. त्याग केल्या शिवाय माणूस भयमुक्त होत नाही. त्याग केल्याने त्याला सर्व प्रकारांचे सुख मिळतं. इच्छांचा त्याग करणं त्यांना पूर्ण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आजतायगत कोणी आपल्या इच्छांना पूर्ण केले आहे ? या सर्व इच्छांपासून बाहेर पडावं. वस्तूंचा मोह आवरा. शांत राहा.
 
20 तोच माणूस सुखी आहे जो आपल्या मनाला समतोल ठेवतो. जो उगाच काळजी करीत नाही. खरं बोलतो. सांसारिक मोहात अडकत नाही, जो काही विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न करत नाही. जो माणूस स्वतःला दुखी करतो तो आपला रूप, रंग, धन, जीवन आणि धर्माला नष्ट करून घेतो आणि जो माणूस शोक किंवा दुःख पासून वाचतो, त्याला सुख आणि आरोग्य मिळतं. सुख दोन प्रकारच्या माणसांना मिळतं. एक त्यांना जे सर्वात जास्त मूर्ख आहे. आणि दुसरे ते ज्यांनी बुद्धीच्या प्रकाशामध्ये घटक बघितले आहे. जे मध्ये लोंबकळणारे आहेत ते दुखी असतात. 
 
21 सभ्य आणि श्रेष्ठ माणसाचे लक्षण आहे की ते दुसऱ्यांचा श्रीमंती बघून हेवा करीत नाही. तो विद्वानांचा आतिथ्य करतो आणि धर्मासाठीचे उपदेश ऐकतो. जो माणूस आपल्या भविष्यावर आधिपत्य ठेवतो (आपला मार्ग स्वतः निवडतो दुसऱ्यांचा हाताची भावली बनत नाही) जो वेळेनुसार विचार करतो आणि त्याला आत्मसात करतो तो माणूस सुख मिळवतो. आळस माणसाचा नाश करतो.
 
22 एकटेच जेवू नका. पैसे मिळवायचे असल्यास कोणाची साथ घ्या. प्रवास देखील एकटे करू नये. जेथे सर्व झोपलेले असतात तेथे एकटेच जगू नये. 
 
23 दम किंवा शक्तीसारखा कोणता धर्म ऐकलेच नाही. दम काय आहे ? क्षमा, धृती, वैर - त्याग, समता, सत्य, साधेपणा, इंद्रिय संयम. सक्रिय राहणे, सौम्य स्वभाव, लज्जा, आनंदी राहणे, समाधानी, मजबूत वर्ण गोड बोलणे, कोणालाही दुखी न करणं, हेवा न करणं, हे सर्व दम किंवा शक्तीमध्ये समाविष्ट आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments