शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 20 जुलै 2022 (12:55 IST)

Om Namah Shivay सुख-समृद्धीसाठी या मंत्राचा जप करा, सर्व संकटे दूर होतील

शिवपुराणानुसार नारदजींनी पार्वतीच्या तपश्चर्येच्या वेळी शिवाला प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय या मंत्राचे महत्त्व सांगितले. आणि या मंत्राचा जप केल्याने देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांना आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केले. हा महामंत्र भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मंत्र सर्वज्ञ, परिपूर्ण आणि स्वभावाने शुद्ध असलेल्या शिवाचे सत्य आहे, यासारखे दुसरे काहीही नाही.

महत्त्व
शिवपुराणानुसार या मंत्राचे ऋषी वामदेव आहेत आणि शिव स्वतः त्याचेे देवता आहे. याचे पाच ध्वनी विश्वातील पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यापासून संपूर्ण सृष्टी तयार होते आणि विघटनाच्या वेळी त्यात विलीन होते. सर्वप्रथम शिवाने हा मंत्र ब्रह्माजींना पाच मुखांनी दिला होता. भगवान शिव हे  सृष्टीचे नियंत्रण करणारे देव मानलेे जातात. 'न' म्हणजे पृथ्वी, 'मः' पाणी, 'शि' अग्नी, 'वा' प्राणवायु आणि 'य' हे आकाश. विश्वातील पाच घटक शिवाच्या पंचाक्षर मंत्राने नियंत्रित केले जाऊ शकतात. वेद आणि पुराणानुसार, विश्वाचा निर्माता असलेल्या शिवाला प्रसन्न करण्यासाठी "ॐ नमः शिवाय" चा जप करणे पुरेसे आहे. या मंत्राने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि या मंत्राचा जप केल्याने तुमची सर्व दुःखे, सर्व संकटे संपतात आणि तुमच्यावर महाकालाच्या असीम कृपेचा वर्षाव सुरू होतो. स्कंदपुराणात सांगितले आहे की - 'ॐ नमः शिवाय', ज्याच्या मनात महामंत्र वास करतो, त्याला अनेक मंत्रांची, तीर्थयात्रा, तपस्या आणि यज्ञांची काय गरज आहे. हा मंत्र मोक्ष देणारा, पापांचा नाश करणारा आणि साधकाला मदत करणारा आहे. तो ऐहिक, अलौकिक सुखाचा दाता आहे.
 
मंत्र जपण्याचे नियम
ॐ नमः शिवाय हा अत्यंत चमत्कारी मंत्र आहे, या मंत्राचा जप पूर्ण भक्तीभावाने आणि शुद्धतेने करावा. या मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा रुद्राक्ष माळीने करावा, कारण भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावा. शिवाचा 'ओम नमः शिवाय' हा मंत्र कुठेही आणि केव्हाही जपला जातो. परंतु या मंत्राचा जप जर तुम्ही बिल्वाच्या झाडाखाली, पवित्र नदीच्या काठी किंवा शिवमंदिरात केला तर उत्तम परिणाम प्राप्त होतात. या मंत्राचा जप केल्याने धन, संतती आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि या मंत्राच्या जपाने सर्व संकटे दूर होतात.