Festival Posters

कार्तिक माहात्म्य - अध्याय १०

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:55 IST)
शिवाय माझे पुष्कळ रिपू जे दैत्य त्यांचें त्यानें रक्षण केलें म्हणून त्यापासून मंथन करुन जें मिळालें तें मीं घेतलें ॥१०॥
पूर्वीं सागराचा पुत्र शंखासुर देवांचा द्वेष करीत होता, त्यालाही माझे धाकटे बंधू विष्णूनें मारिलें ॥११॥
तर जा व हीं समुद्र मंथनाचीं कारणें आहेत असें त्या जलंधराला सांग. नारद म्हणाले - इंद्रानें याप्रमाणें परत पाठविलेला दूत पृथ्वीवर आला ॥१२॥
त्यानें इंद्रानें सांगितलेलें सर्व वर्तमान दैत्यास सांगितलें. तें ऐकून जलंधर संतप्त झाला. रागानें त्याचे ओठ थरथर कांपूं लागले ॥१३॥
तो देवांना जिंकण्याच्या उद्योगास लागला व त्याकरितां चोहोंकडील व पातालांतील कोटयवधि दैत्य तेथें मिळाले ॥१४॥
नंतर तो दैत्येंद्र जलंधर शुंभनिशुंभादि सेनापतींच्या कितीएक कोटी घेऊन स्वर्गास जाऊन नंदनवनांत राहिला. तेव्हां देवही अमरावतीहून युद्धास सज्ज होऊन आले ॥१५॥१६॥
पुढें दैत्याचें मोठें सैन्य अमरावतीला वेष्टून राहिलें आहे असे पाहतांच देव दैत्यांचें युद्ध सुरु झालें ॥१७॥
मुसळ, परिघ, बाणा, गदा, शक्ति, परशु इत्यादि शस्त्रांनी ते एकमेकांवर धांवत जाऊन मारुं लागले ॥१८॥
दोन्ही सैन्यें क्षीण होऊन रक्ताच्या ओघानें भरलीं; हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनीं कित्येक पाडले, दुसर्‍यांनीं त्यांना पाडिले ॥१९॥
त्यावेळेस रणभूमि संध्याकाळच्या मेघाप्रमाणें लाल झाली. त्या युद्धांत जे दैत्य पडत त्यांना शुक्र अमृतसंजीवनी विद्येच्या मंत्राचें पाणी शिंपून उठवीत होता व देव पडतील त्यांना गुरु द्रोणागिरीहून दिव्य औषधी वारंवार आणून उठवीत होता. युद्धांत पडलेले देव पुनः उठलेले पाहून जलंधर रागानें शुक्रास म्हणाला - मीं मारलेले देव पुन्हां कसे उठतात ? ॥२०॥२१॥२२॥२३॥
तुझी संजीविनी विद्या दुसर्‍याला माहीत नाहीं, असे प्रसिद्ध आहे. शुक्र म्हणतात - हे दैत्या, द्रोणागिरीहून गुरु दिव्य औषधि आणून देवांस पुन्हां जिवंत करितो; याकरितां तूं लौकर द्रोणागिरी हरण कर. नारद म्हणतात - राजा, याप्रमाणें सांगताच लागलीच त्या दैत्यानें द्रोणगिरी नेऊन समुद्रांत टाकून दिला व पुन्हा युद्धास आला. नंतर देव पडलेले पाहून गुरु द्रोणाद्रीकडे गेला ॥२४॥२५॥२६॥ तों तेथें द्रोणाद्रि गुरुला दिसला नाहीं; तो दैत्यांनीं नेला असें जाणून गुरु भयभीत झाला ॥२७॥
व दुरुन धापा टाकीत येऊन म्हणाला, देवहो ! पळा, हा बलवान आहे; याला जिंकण्यास तुम्ही असमर्थ आहांत ॥२८॥
हा शंकराचा अंश आहे, पूर्वीची इंद्राची हकीकत आठवा. तें गुरुचें भाषण ऐकून देव भयानें घाबरले ॥२९॥
दैत्यांनी नाश केल्यामुळे देव दाही दिशांनी पळूं लागले. दैत्यांनी देव पळवून लावले असें पाहतांच ॥३०॥
शंख नगारे वाजवून जयघोष करीत तो जलंधर दैत्यांसह अमरावती नगरींत शिरला. दैत्य नगरांत शिरतांच इंद्रादिक सर्व देव दैत्यांच्या त्रासामुळें मेरु पर्वताच्या गुहेंत जाऊन राहिले. याप्रमाणें देवांस जिंकून जलंधर तेथें स्वर्गाचें राज्य करुं लागला ॥३१॥३२॥
नंतर इंद्रादि देवांच्या सर्व अधिकारांवर शुंभ आदिकरुन मोठमोठे दैत्य त्यानें नेमिले व आपण पुन्हां सुवर्णगिरी पर्वताचे गुहेला देवांचा शोध करीत गेला ॥३३॥
इति दशमोऽध्यायः ॥१०॥

सर्व पहा

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पाच शक्तिशाली स्तोत्रे: संकटकाळात पठण केल्यास बजरंगबली स्वतः रक्षण करतात

"रहस्य भाद्रपद महिन्याचे: महादेवाला वर्षातून फक्त एकाच महिन्यात का अर्पण केले जाते हे विशेष फूल?"

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments