Festival Posters

कार्तिक माहात्म्य - अध्याय ९

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:54 IST)
बृहस्पति म्हणतात - हे शंकरा, तूं देवाधिदेव, त्र्यंबक, कपर्दी, त्रिपुरासुराला मारणारा, शर्व, अंधकाला मारणारा, विरुप, सुरुप, बहुरुप, शंभु दक्षयज्ञाचा नाश करणारा, सर्व यज्ञाचें फल देणारा, कालांचा नाश करणारा, कालरुप, सर्प धारण करणारा, ब्रह्मदेवाचें शिर हरण करणारा, ब्राह्मणाचा दयाळू असा आहे; अशा तुला नमस्कार असो ॥१२॥१३॥१४॥
नारद म्हणतात - याप्रमाणें बृहस्पतीनें स्तवन केलेले शंकर त्रैलोक्याला जाळणारी नेत्रांतील अग्निज्वाळा आवरुन म्हणाले ॥१५॥
हे गुरो, तुझ्या स्तुतीनें मी प्रसन्न झालों, वर माग. तूं इंद्राला जीवदान दिलेंस म्हणून तूं जीव या नांवानें प्रसिद्ध हो ॥१६॥
गुरु म्हणाले - देवा, आपण प्रसन्न असाल तर इंद्र शरण आला आहे याचें रक्षण करा व तुमचे तृतीय डोळ्यांतील अग्नि शांत होवो ॥१७॥
शंकर म्हणाले - हा अग्नि पुन्हा कपाळावरील डोळ्यांत कसा शिरेल ? आतां इंद्राला पीडा होऊं नये म्हणून याला मी दूर टाकितों ॥१८॥
नारद म्हणाले - राजा, शंकरांनीं याप्रमाणें बोलून तो अग्नि हातीं घेऊन समुद्रांत टाकला, तो गंगा व समुद्र यांचा संगस आहे तेथें पडला ॥१९॥
इतक्यांत त्याला बाळरुप प्राप्त होऊन तो रडूं लागला. तेव्हां त्या रडण्याच्या शब्दानें पृथ्वी थरथर कांपूं लागली ॥२०॥
त्या रुदनाच्या शब्दानें स्वर्गादिक सत्यलोकांपर्यंत सर्व लोक बहिरे झाले. तें रुदन ऐकून ब्रह्मदेव तेथें आला व हें काय आहे म्हणून आश्चर्य पावला ॥२१॥
इतक्यांत समुद्राच्या मांडीवर तें मूल पाहून ब्रह्मदेव समुद्रास म्हणाला - हें अद्भुत बाळक कोणाचें ? ॥२२॥
ब्रह्मदेवाचें भाषण ऐकून समुद्रानें ब्रह्मदेव आलेला पाहून हात जोडले ॥२३॥
तें मूल ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवून नमस्कार करुन म्हणाला - हे ब्रह्मदेवा, हा सिंधुगंगेच्या संगमांत झालेला माझा मुलगा आहे ॥२४॥
तर हे जगद्गुरो याचे जन्मसंस्कार तूं कर. नारद म्हणाले - याप्रमाणें समुद्र बोलत आहे ॥२५॥
इतक्यांत त्या बालकानें ब्रह्मदेवाची मिशी धरुन ओढली. ब्रह्मदेव हिसके मारुन मिशी सोडवूं लागला. तेव्हां ब्रह्मदेवाच्या दोन्ही नेत्रांतून पाणी आलें ॥२६॥
कष्टानें मिशी सोडविल्यावर ब्रह्मदेव समुद्रास म्हणाले - यानें माझ्या नेत्राचें पाणी धारण केलें ॥२७॥
म्हणून हा जलंधर या नावानें प्रसिद्ध होईल व या योगानें तरुण होऊन सर्व शास्त्रपारंगत होईल ॥२८॥
शंकरावांचून याचा कोणाचेही हातून वध होणार नाहीं. जेथून हा उत्पन्न झाला तेथूनच त्याचा नाश होईल ॥२९॥
नारद म्हणाले - याप्रमाणें ब्रह्मदेवांनीं बोलून शुक्राला बोलावून आणलें व जलंधरास राज्यावर बसविलें व समुद्राचा निरोप घेऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले ॥३०॥
ब्रह्मदेवाच्या दर्शनानें समुद्रास आनंद झाला व त्यानें कालनेमीची मुलगी वृंदा जलंधरास नवरी करण्यास मागितली ॥३१॥
कालनेमी आदिकरुन दैत्यांनीं मोठ्या आनंदानें ती मुलगी जलंधरास दिली; ती उत्तम वश्य स्त्री मिळाल्यावर व उत्तम आप्त मिळाल्यावर शुक्राच्या सहाय्यानें तो बलवान् होऊन राज्य करुं लागला ॥३२॥
इति पद्म० का० मा० जलन्धरवर्णनंनाम नवमोऽध्यायः ॥९॥

सर्व पहा

"रहस्य भाद्रपद महिन्याचे: महादेवाला वर्षातून फक्त एकाच महिन्यात का अर्पण केले जाते हे विशेष फूल?"

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य ''गुलकंद-ड्रायफ्रूट बेसन लाडू'' नक्की ट्राय करा

Paryushan 2026 पर्युषण म्हणजे काय?, श्वेतांबर आणि दिगंबर पर्युषणातील फरक जाणून घ्या

ज्येष्ठा गौरी पूजनात कोणत्या चुका टाळाव्यात?

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments