suvichar

कार्तिक माहात्म्य - अध्याय १२

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:56 IST)
अशा स्त्रीचा जो उपभोग घेणारा त्याचीच संपत्ति श्रेष्ठ आहे. तूं सर्व रत्नांच्या धनी आहेस, तरी तसें तुझें ऐश्वर्य नाहीं ॥१२॥
याप्रमाणें बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रुपाचें वर्णन त्यानें ऐकल्यामुळें तो कामज्वरानें पीडित झाला ॥१३॥
नंतर विष्णूच्या मायेनें मोहित झाल्यामुळें त्यानें आपला दूत राहू याजला शंकराकडे पाठविलें ॥१४॥
तो शुक्लपक्षींच्या चंद्राप्रमाणें तेजस्वी अशा कैलासाला गेला, तेव्हां त्याच्या काळ्या शरीरामुळें तो कैलास कृष्णपक्षींच्या चंद्राप्रमाणें भासूं लागला ॥१५॥
नंदीनें शंकराला तो आल्याची खबर दिल्यावर तो आंत प्रवेश करिता झाला. शंकरांनीं त्यास भ्रूलतेनें बोलण्याची खूण करतांच तो बोलूं लागला ॥१६॥
राहू म्हणतो - देव नाग ज्याची सेवा करितात, जो त्रैलोक्याचा व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर त्याची तुम्हांला आज्ञा आहे; ती वृषध्वज शंकरा ऐका ॥१७॥
तूं स्मशानांत राहणारा, अंगावर हाडकें बाळगणारा, दिगंबर ( नग्न ) असणारा, अशा तुला अशी सुंदर स्त्रीरत्न पार्वती कशी शोभेल ? ॥१८॥
मी सर्व रत्नांचा मालक आहें आणि पार्वती स्त्रियांत रत्न आहे; तेव्हां ती मलाच योग्य आहे, तुला भिक्षा मागून खाणाराला ती योग्य नाहीं ॥१९॥
नारद म्हणतातः-- याप्रमाणें राहू बोलत आहे इतक्यांत शंकराच्या भुवयांमधून विजेसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला ॥२०॥
त्याचें तोंड सिंहासारखें, जीभ बाहेर आलेली व लळलळ करणारी, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणें ज्याचे डोळे, मोठा उंच, केस उभे, शरीर कृश, भयंकर जसा दुसरा नारसिंहच ॥२१॥
असा तो पुरुष राहूला खाण्याकरितां धावला. तें पाहून राहू घाबरुन भयानें अति वेगानें बाहेर पळाला; तरी त्याला त्यानें धरिलें ॥२२॥
हे राजा, तो राहू मोठ्यानें ओरडून शंकराला म्हणाला - देवा, मी शरण आलों; माझें रक्षण कर ॥२३॥
मला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे; त्या ब्राह्मण राहूचें हें भाषण ऐकून शंकर म्हणाले ॥२४॥
तो राहूला धरुन खाणार इतक्यांत शंकरांनीं त्याचें निवारण केलें व म्हणाले - हा दूत दुसर्‍याचा चाकर आहे म्हणून हा वध करण्यास योग्य नाहीं ॥२५॥
याला सोड. असें ऐकतांच त्यानें राहूला आकाशांत फेकले. नंतर तो पुरुष शंकराची विनंति करुं लागला ॥२६॥
पुरुष म्हणालाः-- मला फार भूक लागली आहे. मी भुकेनें व्याकुळ झालों आहें; मी काय खाऊं त्याची आज्ञा करा ॥२७॥
शंकर म्हणालेः-- तूं आपल्या हातापायांचें मांस खा. नारद म्हणतात - शंकरांनीं अशी आज्ञा करितांच तो आपल्यालाच खाऊं लागला ॥२८॥
हात पाय वगैरे सर्व मांस खाल्लें. फक्त मस्तक शेष राहिलें. तें पाहून शंकर प्रसन्न झाले ॥२९॥
असें घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले. शंकर म्हणतात - तूं कीर्तिमुख या नावांचा होऊन नेहमीं माझे दारांत रहा ॥३०॥
तुझी प्रथम पूजा जे करणार नाहींत ते मला प्रिय होणार नाहींत. नारद म्हणतातः-- तेव्हांपासून देवाच्या दारांत कीर्तिमुख राहिला ॥३१॥
जे अगोदर त्याची पूजा करणार नाहींत त्यांची पूजा निष्फळ होईल. त्यानें फेकलेला राहू त्याचे हातून सुटला तो बर्बर देशांत पडला ॥३२॥
म्हणून राहू बर्बरदेशांत झालेला असें त्याचें नांव प्रसिद्ध झालें. नंतर राहूनें आपला पुन्हां जन्मच झाला असें मानलें व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली ॥३३॥
इति श्रीप. का. मा. द्वादशोऽध्यायः ॥१२॥

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

ज्येष्ठा गौरी पूजनात कोणत्या चुका टाळाव्यात?

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments