Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पंधरावा

Updated: बुधवार, 19 जून 2024 (11:23 IST)
राज्य करी राजा नळ ॥ पुण्यप्रतापी धर्मिष्ठ केवळ ॥ हरिभजनी सदा सुशीळ ॥ प्रजापाळी यथाविधी ॥१३॥
नळ केवळ पुण्यपावन ॥ त्यांचे स्मरण करितां जन ॥ सप्त जन्मीचीं पातकें जाण ॥ भस्म होती क्षणार्धें ॥१४॥
पुण्याचा केवळ भांडार ॥ सत्वाचा तो केवळ गिरीवर ॥ धैर्याचा जैसा समर ॥ नळराजेश्वर पुण्यनिधी ॥१५॥
तीळभरी पाप जाण ॥ नसे राजयालागुन ॥ हरिभजनी अखंड जाण ॥ पुण्यपावन तो असे ॥१६॥
नळराजा एके दिवशीं ॥ बैसला होता सेभेसी ॥ तयेवेळीं शौच्यासी ॥ गेला तेव्हां राजेश्वर ॥१७॥
राजा करी पादप्रक्षालन ॥ संधींत कोरडे राहिले जाण ॥ तेणें राजयासी दोष लागू ॥ पापबुध्दी उपजली ॥१८॥
पाप संचरलें अंतरीं ॥ द्यूत खेळावें निर्धारी ॥ तो पूर्वीचा ऋषी ते अवसरी ॥ कर्णीं कली करील रुपें ॥१९॥
द्यूत खेळे राजेश्वर ॥ तो एक दुसरा खेळणार ॥ पुष्करनाम तयाचें निर्धार ॥ खेळे राजया बरोबर ॥२०॥
राजा न विचारी मनीं ॥ राज्य मांडिलें खेळावरी ॥ पुष्करें राज्य ते अवसरी ॥ जिंकोन राजा बाहेर घातला ॥२१॥
राजा निघतांची बाहेर ॥ मग मनी करी विचार ॥ म्हणे कर्मगती गहन थोर ॥ दशा कैशी हे जाहली ॥२२॥
उगाची कर कपाळीं लाउन ॥ मौन्येंची राजा करी रुदन ॥ भूमीवरी आंग टाकून ॥ क्षणएक निचेष्टित पडियेला ॥२३॥
दमयंतीही रुदन करी ॥ अंग कापतसे थरथरी ॥ अश्रुधारा ते अवसरी ॥ शोक करी दारुण ॥२४॥
दोघें करिती चिंता फार ॥ म्हणती कैसा करावा विचार ॥ कोठें जावें हा निर्धार ॥ करती झाले मनामाजी ॥२५॥
मग दोघेजण उठोन ॥ जाते झाले वना लागुण ॥ तेव्हां करुनी रुदन ॥ कर्मभोग विचित्र म्हणती ॥२६॥
चरणीं रुतती खडे कांटे ॥ जवळी जळ न मिळे कोठें ॥ शोक करती अति नेटें ॥ उष्ण शरीरीं लागतसें ॥२७॥
बहुत श्रम होती जाण ॥ मुखीं करती हरीचे चिंतन ॥ हळुहळु पंथ क्रमुन ॥ चालताती बहुश्रमीं ॥२८॥
तों दृष्टी देखिलें एक नगर ॥ नदी वाहे तेथें साचार ॥ त्या नदीचे उत्तरे तीरे ॥ बैसते झाले दोघे जण ॥२९॥
नळ राजा जळीं जाऊन ॥ धरुनी आणिले मीन ॥ क्षुधा लागली अति दारुण ॥ भक्षालागली अति दारूण ॥
भक्षावयालागीं घेतले ॥३०॥
राजा म्हणें दमयंती ॥ हे मच्छ धुवोनि निश्चित ॥ शिजवी भक्षावयाप्रती ॥ आपणासी आतां हे ॥३१॥
ऐसें राजा बोलून ॥ दमयंतीस मच्छ दिले जाण ॥ म्हणे मी ग्रामांतून ॥ येतो परतोन लवलाहें ॥३२॥
राजा गेला नगरांत ॥ तो कोठें समाराधना होत॥ ब्राह्मण जेविती असंख्यात ॥ गणना नसे तयासी ॥३३॥
तेथें जाऊन राजेश्वर ॥ कौतुक पाहे समोर ॥ तों तेही बोलाविले सत्वर ॥ भोजनालागीं तेवेळीं ॥३४॥
राजा करी तेथें भोजन ॥ पात्र जरी द्याल वाढुन ॥ तरी मी जाईन घेऊन ॥ स्त्री माझी बाहेर असे ॥३५॥
त्यांही तैसेंच केलें ॥ पात्र तयासी वाढुन दिधलें ॥ राजा घेऊन आला तेवेळे ॥ मार्गी येतां वर्तलें कौतुक ॥३६॥
तों कली पक्षीयाचें रुप घेऊन ॥ झडप मारी वरुन ॥ गगनपंथें येवोन ॥ पात्र हातीचें नेतसे ॥३७॥
राजा सद्गद झाला चित्तीं ॥ म्हणे धन्य प्राक्तनाची गति ॥ अन्न मिळालें बहु संकटीं ॥ तेंही नेलें पक्षीयानें ॥३८॥
इकडे काय वर्तलें जाण ॥ दमयंतीने मच्छ नेऊन ॥ नदींत बैसली धूत आपण ॥ तों मच्छ जिवंत जाहला ॥३९॥
तिच्या बोटीं अमृत होतें ॥ म्हणोनी मच्छ सजीव त्वरीत ते ॥ पुन्हा जळ प्रवेश करती ते ॥ एकही न राहे तियेजवळी ॥४०॥
तव तो राजा नळ आला ॥ राणीनेम वृत्तांत सांगितला ॥ क्षुधानळ बहुत पेटला ॥ कांही न सुचे तयासी ॥४१॥
तेव्हां दमयंती दीन वदन ॥ राजयाप्राती बोले वचन ॥ मच्छ गेले जवळीचे जाण ॥ जीव आला तयालागीं ॥४२॥
राजा बोले क्रोधें वचन ॥ तूंच भक्षिलें मच्छा लागून ॥ सांगतेस मजला असत्य वचन ॥ नव्हे तुझें सत्य सर्वथा ॥४३॥
राजा उठोनी तेसमयीं ॥ गेला स्नानास लवलाहीं ॥ वस्त्र बाहेर ठेविलें पाही ॥ स्नानासी नळ प्रवेशला ॥४४॥
तो कली पक्षी झाला पूर्ण ॥ वस्त्र घेऊन गेला जाण ॥ राजा जळीं होता नग्न ॥ दमयंतीस पाचारी ॥४५॥
दमयंतीनें आपुलें वस्त्र ॥ अर्ध फाडोन दिधलें साचार ॥ तेंच नेसला राजेश्वर ॥ स्नानकरुनी ते काळीं ॥४६॥
दमयंती म्हणी राजया लागून ॥ तुम्हीं गांवांतून आले जेऊन ॥ दोघांचे मनामाजी जाण ॥ संशय दारुण पडियेला ॥४७॥
दोघे उपोषीत असती ॥ गेले कुंभाराच्या गृहाप्रती ॥ निद्रा केली निश्चिती ॥ क्षुधेनें बहुत व्याकुळ होती ॥
तैसेच निजती दोघेजण ॥४८॥
रात्री रायाच्या मनी जाण ॥ दुर्बुध्दी उपजली दारूण ॥ दमयंतीस जावें टाकून ॥ उठला राजा ते समयीं ॥४९॥
दमयंती होती निद्रीस्त ॥ राजा उठोन गेला त्वरित ॥ जागी होऊन जो पहात ॥ भ्रतार जवळी न दिसे ॥५०॥
ऐसें दमयंतीनें पाहून ॥ शोक आरंभिला ते क्षणीं ॥ मूच्छित पडे धर्णी ॥ नळराजा कारणें ॥५१॥
मजवीण तुज एक क्षण ॥ न गमे रायास सत्य जाण ॥ आतां निष्ठूर केले मन ॥ म्हणोनि रुदन करीतसे ॥५२॥
ललाट पिटी मेदिनी ॥ आंग टाकिलें धरणी ॥ म्हणी आतां कोणत्या वनी ॥ पाहूं तुज राजेश्वरा ॥५३॥
काय माझा पहिला अन्याय ॥ कां निष्ठुर झाले ह्र्दय ॥ मी आतां करुं काय ॥ जाउं कोठें राजेश्वरा ॥५४॥
शोक करतां दारूण ॥ नेत्री वाहे अपार जीवन ॥ निचेष्ठित पडली एक दिन ॥ राजा मनीं आठवीत ॥५५॥
मग ते विवेक करुनी ॥ उठती झाली ते क्षणी ॥ हळुहळु पंथ क्रमोनी ॥ येती झाली पितयाचे नगरी ॥५६॥
येऊन बैसली बाहेर ॥ पितयास कळला समाचार ॥ म्हणती दमयंती कन्या सुंदर ॥ बाहेर येऊन बैसलीसे ॥५७॥
राजा न्यावयासी तिज आला ॥ मंदिरी आपुल्या घेऊन गेला ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे ते वेळां ॥ पतिचे स्मरण करुनी ॥५८॥
राजा समजावी दमयंतीतें ॥ शोक न करी म्हणे माते ॥ वर्तमान निवेदन करी वर्तलें तें ॥ मग दमयंतीनें सर्व
सांगितलें ॥५९॥
राजा जोऊन सद्गदीत ॥ ह्रदयीं तीस आलंगित ॥ म्हणे कन्ये शोक सत्य ॥ न करी तू आतां येथूनी ॥६०॥
जेथें असेल राजा नळ ॥ तेथून शोधून आणिन तात्काळ ॥ नको करुं तूं तळमळ ॥ निश्चित राहे सर्वथा ॥६१॥
रायें बोलावून ब्राह्मण ॥ तयासी पुसे व्रत अनुष्ठान ॥ कोणतें करावें जेणें नळ आपण ॥ चालोन येईल येथें पै॥६२॥
विप्र म्हणती राया ऐक ॥ कोकिळाव्रत पुण्यदाय्क ॥ दमयंती करील देख ॥ तरी नळ येईल येथेंची ॥६३॥
मग कोकिळाव्रत उत्तम ॥ करी दमयंती सप्रेम ॥ व्रताचा विधियुक्त करी नेम ॥ धरीला तेणें निजनिष्ठें ॥६४॥
तेणें नळास प्राप्त झाली चिंता ॥ की श्वशुरगृहीं जावें आतां ॥ मग नळराजा अवचिता ॥ येता झाला श्वशुरगृहीं
॥६५॥
तेणें सकळांसी झाला आनंद ॥ ब्राह्मणालागीं दान देत ॥ ते समयीं शर्करा वाटित ॥ नगरामाजी ते काळी ॥६६॥
कोकिळाव्रताचें पुण्य प्रबळ ॥ दमयंतीस भेटला नळ ॥ तेणी आनंदाचा कल्लोळ ॥ अंतरी उल्हास न मावें ॥६७॥
जे करिती कोकिळाव्रत ॥ त्यासी भय नाहीं जन्मावरी निश्चित ॥ रोग दु:ख दरिद्र समूळ सत्य ॥ पळोन जाती सर्वस्वें
॥६८॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ पंचदशोऽध्याय: ॥६८॥ ॥ अध्याय ॥१५॥ ओंवी ॥६८॥
॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय १५ वा समाप्त: ॥

सर्व पहा

Chaturmas 2026: चातुर्मास कधी सुरू होतो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, नियम आणि या काळात काय करावे

Nagpanchami 2026 Date नागपंचमीची पूजा कधी? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Guru Purnima Wishes Images गुरूपौर्णिमा शुभेच्छा इमेजेस

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

गुरु पौर्णिमेला घरीच शेगावच्या गजानन महाराजांचे पूजन कसे करावे? वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments