Dharma Sangrah

गांधारीला आपल्या पुत्र दुर्योधनाला नग्न का बघावयाचे होते?

Updated: बुधवार, 20 मे 2020 (22:54 IST)
 
मग दुर्योधन विचारात पडतो आणि आपल्या गुप्तांगावर केळीचे पान लावून आपल्या आईच्या समोर येतो आणि म्हणतो की मी अंघोळ करून आलो आहोत. गांधारी त्याला म्हणते की मी आज आपल्या डोळ्यावरची ही पट्टी काढणार आहे. मी आजतायगत तुझ्या भावांना तर बघितले नाही पण मी आज तुला बघणार आहे. 
 
असे म्हणून गांधारी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून दुर्योधनाला बघते. तिच्या डोळ्यातून तेजपुंज निघून दुर्योधनाच्या अंगावर पडतात. नंतर गांधारी बघते तर दुर्योधनाने आपले अंग केळीच्या पानाने लपविले आहे. तेव्हा ती त्याला म्हणते की हे तू काय केलंस? 
 
त्यावर दुर्योधन उत्तरतो की मी आपल्यासमोर नग्नावस्थेत कसा काय आलो असतो. गांधारी म्हणते की पण मी तर तुला असे यायलाच सांगितले होते. 
 
दुखी मनाने ती आपल्या डोळ्यावर परत पट्टी बांधून घेते. आणि सांगते की तुझ्या अंगाचा तो भाग जो मी बघितलाच नाही दुर्बळ राहिला आणि बाकीचे अंग वज्राचे झाले. तू मोठ्यांची आज्ञा पालनाची परंपरेला विसरला नसता तर आज तू अजिंक्य झाला असता.
 
हे ऐकून दुर्योधन म्हणतो की मग मी हे पान काढून टाकतो. त्यावर गांधारी म्हणते की मी कोणी मायावी नाही. माझ्या सर्व भक्तीची शक्ती, माझे सतीत्व, प्रेम आणि वात्सल्य त्या एका दृष्टिक्षेपात मिसळले होते. 
 
तेव्हा दुर्योधन म्हणतो की आपण काळजी नका करू मी उद्या भीमाशी गदायुद्ध करीन आणि गदा युद्धाच्या नियमानुसार कंबरेच्या खाली मारणे निषिद्ध आहे. उद्या मी त्याला इतके मारेन की तो घाबरून स्वतःच मरून पडेल. मग युद्धाचा अंत काही ही होवो. नंतर भीम दुर्योधनाच्या मांडी वर वार करतो आणि त्यांची मांडी तोडून त्याला ठार मारतो.

सर्व पहा

आषाढ पौर्णिमेलाच का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा? जाणून घ्या महर्षी व्यास आणि गुरु परंपरेचा इतिहास

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख