1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (10:24 IST)

कोण होते संत गाडगे बाबा? Gadge Maharaj

संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती

डेबूजी झिंगराजी जानोरकर, ज्यांना सामान्यतः संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबा म्हणून ओळखले जाते, हे एक समाजसुधारक कीर्तनकार आणि संत होते ज्यांनी महाराष्ट्रात सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी साप्ताहिक उत्सव आयोजित केले. त्यांनी त्यावेळी भारतीय ग्रामीण भागात खूप सुधारणा केल्या आणि आजही अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आहेत.
 
प्रारंभिक जीवन
संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुकाच्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर तर त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आणि आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते.
 
1892 साली त्यांचे लग्न झाले. कमलापूर तरोडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी डेबुचा विवाह पार पडला. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत.
 
1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे सुमारे 3 वाजता वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले. अनेक ठिकाणी भ्रमण केले. ते एक प्रवासी सामाजिक शिक्षक होते, पायात फाटलेल्या चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटी घेऊन ते पायी प्रवास करायचे. आणि हीच त्यांची ओळख होती. गावात प्रवेश केला की लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करत असे आणि काम आटोपल्यावर ते स्वतः गाव स्वच्छ केल्याबद्दल लोकांचे अभिनंदन करायचे. गावातील लोकं त्यांना पैसे देत असे मात्र बाबा तो पैसा समाजाच्या विकासासाठी आणि भौतिक विकासासाठी वापरायचे. लोकांकडून मिळालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांचे निवारे बांधत असत.
 
गावांची स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनांचे आयोजन करत असत आणि त्यांच्या कीर्तनांद्वारे ते लोकोपयोगी आणि समाजकल्याणाचा संदेश देत असत. आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करत असत. संत कबीरांच्या दोहेचा त्यांनी आपल्या कीर्तनात वापर करत असे. संत गाडगे बाबा हे खरे निस्वार्थी कर्मयोगी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोठा, शाळा, रुग्णालये, वसतिगृहे बांधली.
 
दान म्हणून आलेल्या पैशांची त्यांनी हे सर्व बांधले, पण या महामानवाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. आपले संपूर्ण आयुष्य धर्मशाळेच्या व्हरांड्यात किंवा जवळच्या झाडाखाली घालवले. गुरूदेव आचार्यजींनी अगदी बरोबर म्हटले आहे एक लाकूड, फाटलेली चादर आणि खाण्यापिण्यासाठी एक मातीचं पात्र आणि कीर्तन करताना झापली ही त्यांची संपत्ती होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांना मातीच्या भांड्यांचे गाडगे बाबा आणि इतर ठिकाणी चिंध्याचे बाबा असे संबोधले जात असे. त्यांचे खरे नाव आजपर्यंत कोणालाही माहीत नाही.
 
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता, जनजागृती आणि सामाजिक क्रांतीचा अखंड स्त्रोत असलेल्या संत गाडगेबाबा यांचे देवसदृश्य सौंदर्य व सुडौल शरीर, गोरं वर्ण, भारदस्त कपाळ आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे लोक त्यांना डेबूजी म्हणू लागले.
 
त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंग्राजी जानोरकर झाले. गौतम बुद्धांप्रमाणे त्यांनी 1905 मध्ये पीडित मानवतेला मदत करण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी घर सोडले. त्यांनी मध्यरात्री एक लाकडी आणि मातीचे भांडे घेऊन घर सोडले, ज्याला गडगा (लोटा) म्हणतात. दया, करुणा, बंधुता, सौहार्द, मानव कल्याण, परोपकार, निराधारांना मदत करणे या गुणांचे भांडार असलेले बुद्धाचे आधुनिक अवतार डेबूजी सन 1905 ते 1917 पर्यंत साधकाच्या अवस्थेत राहिले.
 
डेबूजी नेहमी आपल्याजवळ मातीचं भांडे ठेवत. यामध्ये तो अन्न खात असे आणि पाणीही पीत असे. महाराष्ट्रात मडक्याच्या तुकड्याला गडगा म्हणतात. त्यामुळे काही लोक त्यांना गाडगे महाराज म्हणू लागले तर काही लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले आणि पुढे ते संत गाडगे या नावाने प्रसिद्ध झाले. गाडगे बाबा हे डॉ. आंबेडकरांचे समकालीन होते आणि त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. वास्तविक गाडगे बाबा अनेक राजकारण्यांना भेटत असत. पण डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
 
याचे कारण समाजसुधारणेचे जे कार्य ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला उपदेश करून करत होते, तेच काम डॉ. आंबेडकर राजकारणातून करत होते. गाडगे बाबांच्या कार्यामुळेच डॉ. आंबेडकर तथाकथित ऋषी-संतांपासून दूर राहून गाडगे बाबांचा आदर करत असत. गाडगे बाबांना ते वेळोवेळी भेटत असत आणि समाजसुधारणेच्या मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेत असत. 
 
संग गाडगे बाबा कार्य
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
1908 मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.
1917 मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
1921 मध्ये मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले.
1932 मध्ये नाशिक येथे सदावर्त उघडले.
1931 मध्ये वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
1949 मध्ये स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या 'संत चोखामेळा धर्मशाळे'ची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले.
1952 मध्ये 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
1954 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.
1954 मध्ये गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
 
14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले. 20 डिसेंबर 1956 रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.
 
संत गाडगेबाबांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले. ते एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. त्यांनी 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' सुरू केले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. वाईट चालीरिती परंपरा रूढी बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. 
 
संत गाडगे बाबांचे उपदेश साधे आणि सोपे असत. चोरी करू नये, कर्ज काढू नये, व्यसनांच्या आहारी जाऊ नये, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नये असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत.
 
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
भुकेलेल्यांना अन्न
तहानलेल्यांना पाणी
उघड्या नागड्यांना वस्त्र
गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत
बेघरांना आसरा
अंध, पंगू रोगी यांना औषधोपचार
बेकारांना रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय
गरीब तरुण-तरुणींचे लग्न
दुःखी व निराशांना हिंमत
गोरगरिबांना शिक्षण