शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 19 मे 2021 (16:11 IST)

सिंगापूर शाळा का बंद करीत आहे, नवीन वैरिएंटबद्दल भीतीचे वातावरण, सर्व काही जाणून घ्या

भारतातील कोरोनाची दुसरी लाट (Covid Second Wave) दरम्यान, आता सिंगापुरामधील (Singapore) कोरोनाचे नव्या वेरियंटने जगाला अस्वस्थ केले आहे. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की कोरोनातील B.1.167 वैरिएंट मुलांमध्ये अधिक परिणाम करत आहे. सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी म्हटले आहे की मुले कोरोना, B.1.167 या नवीन प्रकारात बळी पडत आहेत. असे म्हटले जात आहे की कोरोनाचा हा प्रकार अतिशय वेगाने पसरत आहे. कोविड -19 प्रकरण वाढल्यानंतर सिंगापुरामध्ये लोक जमा होण्यावर आणि सार्वजनिक कामांवर कडक निर्बंध लादले आहेत.
 
तथापि, सिंगापुरामध्ये या नवीन प्रकारामुळे किती मुले बळी पडली आहेत याबद्दल निश्चित माहिती नाही. आरोग्यमंत्री म्हणतात की देशात नवीन प्रकरणांमध्ये भर पडली आहे, यामुळे लोकांची येणेजाणे थांबविणे फार महत्त्वाचे आहे. सांगायचे म्हणजे की सिंगापूरच्या कोरोना व्यवस्थापनासाठी जगभरात प्रशंसा झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची 61 हजार प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी बहुतेकजण विदेशी मजुरांच्या वसतिगृहातूनही आले होते. संपूर्ण देशातील सुमारे 20 टक्के लोकांना कोरोना लसचे दोन्ही डोस मिळाले आहेत. मॉडर्ना आणि फायझरच्या लसद्वारे देशात लसीकरण केले जात आहे.
 
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भारतात चर्चा रंगली
वास्तविक, मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असा दावा केला आहे की सिंगापूरच्या प्रकारामुळे कोरोनाची तिसरी लाट भारतात येऊ शकते. सिंगापूरमधून येणेजाणे  थांबवावे असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले आहे. या विषाणूसंदर्भात प्रश्न विचारल्यावर कोविड नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे की आम्ही कोविड संक्रमणाबाबतच्या अहवालाचे परीक्षण करीत आहोत. दिलासा देणारी बाब म्हणजे की त्यांच्यामध्ये संक्रमण गंभीर नाही. आम्ही ते पाहत आहोत.
 
सिंगापूर सरकार चिंतेत आहे, शाळा बंद केल्या जात आहेत
सिंगापुरामध्ये गेल्या काही महिन्यांमधील नवीन प्रकरणांची संख्या जवळजवळ शून्य आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये येथे तुलनेने फारच कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु आता स्थानिक पातळीवर संक्रमणाच्या वाढत्या घटनांमुळे देशातील सरकार चिंतेत पडले आहे. त्यामुळे शाळांसह अन्य ठिकाणी निर्बंध लादले जात आहेत. मागील वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट असल्याने सार्वजनिक ठिकाणी मर्यादित सूट आहे.