1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

सावध रहा! भारतात कोणतेही मोबाइल अॅप पूर्णपणे सु‍रक्षित नाही

नवी दिल्ली- सरकार मोबाइल फोनद्वारे डिजिटल भुगतान करण्यावर जोर देत आहे. इकडे चिपसेट कंपनी क्वालकॉमने म्हटले की भारतात वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्ससद्वारे हार्डवेअर स्तराची सुरक्षे वापरली जात नाहीये, ज्यामुळे ऑनलाईन देण-घेण सुरक्षित होऊ शकते.
 
क्वालकॉमचे वरिष्ठ निदेशक उत्पाद व्यवस्थापन एसव्हाई चौधरी यांनी म्हटले की, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुनियेत बँकिंग आणि वॉलेट अॅपद्वारे हार्डवेअर सुरक्षा वापरली जात नाहीय. हे पूर्णपणे अॅड्राईडवर काम करत आहे. यात प्रयोगकर्त्यांचा पासवर्ड चोरी केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटही छापले जाऊ शकतात. भारतात अधिकतर वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅपची हीच स्थिती आहे.
 
त्यांनी म्हटले की भारतात सर्वाधिक लोकप्रिय डिजीटल भुगतान अॅपद्वारे ही हार्डवेअर स्तराची सुरक्षा वापरण्यात येत नाहीये.