कावेरी पाणी वाटप प्रश्नात तामिळनाडूला मोठा धक्का बसला. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचं तामिळनाडूतील जनतेला वाटतं. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. या पार्श्वभूमीवर मोदी तामिळनाडूत येत आहेत. मोदींच्या या तामिळनाडू भेटीचा निषेध सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.