Marathi Biodata Maker

राविनाची शेतकऱ्यांवर टीका नेटीझन्स ने जोरदार फटकारले

सोमवार, 4 जून 2018 (17:13 IST)

प्रसिद्धीत राहण्यासाठी अनेक पडेल कलाकार नेहमी वाद निर्माण करतात. असाच प्रकार पडीक अभिनेत्री रवीना टंडन ने केला आहे. सध्या सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपावर तिने टीका केली आहे. तिने शेतकरी वर्गाला फटकारले आहे. सोशल मीडियावर तिने जोरदार टीका सुरु केली आहे ती म्हणतेय की  दोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असे ती म्हणत आहेत. यावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. नेटकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांना संपावर का जावे लागते हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यावा लागतो. ज्यांना शेतीबाबत काहीही ठाऊक नाही त्यांनी आपली अक्कल पाजळू नये असे अरूण गायकवाड या नेटकऱ्याने म्हटले आहे. तर तुम्हाला महालात राहून शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार? असा प्रश्न मुनीश जैन या नेटकऱ्याने विचारला आहे. तर गणेश सुरवसे या नेटकऱ्याने रविना टंडन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्ही या लोकांसाठी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. तुमच्या घरातले कोणी शेतकरी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. असे खडे बोल सुनावले आहेत. दैनिक लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. रवीना सध्या रिकामी आहे तिला आता पूर्वी सारखे काम मिळत नाही. त्यामुळे ती अशी प्रसिद्धी मिळवत आहे असे काही म्हणत आहेत. 

 

 

What a sad thing to happen . Terrible way to protest. Any harm to public property,transport or commodities,should be instantly arrested and jailed without bail . https://twitter.com/dna/status/1002467780912766976 

  •  

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments