शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्यांनी नगदी अनुदान सोडावे -किशोर तिवारी

आज जगातील ७० टक्के प्रदूषण रासायनिक शेतीमुळे होत असुन हरीत क्रांतीच्या नावावर मातीच्या कणाकणात व पाण्याच्या प्रत्येक थेंबात विष ओतणाऱ्या रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे झाले असुन जगात मूठभर भांडवलदार देशानी पर्यावरणाचे व जीवसृष्टीचे अतोनात नुकसान केले असुन आता पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने  दिलेल्या अंतरीम अर्थ संकल्पात शेतकऱ्यांना २ हेक्टर ची मर्यादित जमीन धारणा असणाऱ्या वार्षिक ६००० रुपये नगदी अनुदानाची  घोषणा केल्यामुळे ही मदत सिंचन क्षेत्रातील ऊस द्राक्ष बी टी कापुस या सारख्या अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फारच तोटकी असल्याची होत असलेली प्रचंड ओरड रास्त असुन या सर्व शेतकऱ्यांनी शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्यांनी नगदी अनुदान सोडावे अशी मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. 
 
किशोर तिवारी हे विदर्भातील कोरडवाहू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताकरिता मागील ३० वर्षांपासून चळवळ आहेत व अती पाण्याच्या व  रासायनिक कीटकनाशक व खतांच्या प्रचंड वापरामुळे जमीनीतील व पर्यावरणातील प्राणवाषूचे व प्रदूषणाचे संकट निर्माण झाले असुन याला भांडवलदार देशानी पर्यावरणातील फरक वा कालयमेट चेंज असे नाव देऊन मूळ विनाशकारी विषयुक्त शेतीपासून कट रचुन दूर ठेवले आहे त्यामुळे मातीमध्ये कार्बन टक्केवारी कमीतकमी ३ ते ४ टक्के व पाणी विषमुक्त करण्यासाठी सरकार सोबत भांडत असुन त्यांनी नगदी अनुदान देतांना एकच नागडी वर्षानुवर्षे घेणाऱ्या अती पाण्याच्या व  रासायनिक कीटकनाशक व खतांच्या प्रचंड करून ऊस द्राक्ष बी टी कापुस या सारख्या अती पाण्याचे व रासायनिक शेतीप्रधान नगदी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी  शाश्वत परंपरागत शेती व पर्यावरणाच्या पुनर्स्थानेकरीता आपले अनुदान सोडावे व सरकारने धान्य ,डाळ व तेलबियाणे तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या वाढून द्यावे अशी मागणी पुठे रेटली आहे.