मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (13:36 IST)

मुकेश अंबानींची आश्चर्यकारक कामगिरी - रिलायन्सचा नफा 20 वर्षांत 20 पटीने वाढला

Mukesh Ambani's amazing achievement
मुकेश अंबानी 20 वर्षांपूर्वी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले. रिलायन्सची सूत्रे हाती घेताच यशाची पताका फडकवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने गेल्या दोन दशकांमध्ये महसूल, नफा तसेच बाजार भांडवलात सातत्यपूर्ण दुहेरी अंकी वाढीचा दर गाठला आहे. या कालावधीत कंपनीचे बाजार भांडवल 42 पटीने वाढले आणि नफा जवळपास 20 पटीने वाढला.
 
मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्सच्या परिवर्तनाचे नायक नाहीत, त्यांच्या नेतृत्वात म्हणजेच गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांवर नोटांचा वर्षाव झाला. वार्षिक 87 हजार कोटी या दराने गुंतवणूकदारांच्या खिशात 17.4 लाख कोटी रुपये आले. दरम्यान, रिलायन्सला जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक मिळाली. फेसबुक, गुगल आणि बीपी सारख्या मोठ्या कंपन्या रिलायन्सच्या दारात उभ्या आहेत.
 
देशातील सर्वात मोठ्या कंपनीच्या यशोगाथेचे अनेक महत्त्वाचे अध्याय मुकेश अंबानी यांनी स्वत:च्या हाताने लिहिले आहेत. तेलापासून सुरुवात करून, कंपनीने दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात प्रवेश केला आहे. डेटाला 'न्यू-ऑयल' म्हणणारे मुकेश अंबानी हे पहिले होते. आणि डेटाने देशातील सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन किती बदलले आहे हे सांगण्याची गरज नाही.
 
अंबानींनी रिलायन्स जिओ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक उभारली. ज्याने फार कमी वेळात यशाचा झेंडा रोवला. जिओच्या आगमनानंतर देशाने डिजिटल जगात जी घोडदौड सुरू केली, ते पाहून जगाने आश्चर्य केले. आज सर्वाधिक डिजिटल व्यवहारांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. हातगाडीपासून 5 तारांकित हॉटेलपर्यंत डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा आहे. यामागे सरकारचे प्रयत्न आहेत, पण याचे संपूर्ण श्रेय रिलायन्स जिओलाही जाते. ज्याने नवीन रेषा ओढली. जिओच्या आगमनानंतर सुमारे 250 रुपये प्रति जीबी असलेला डेटा जवळपास 10 रुपयांपर्यंत घसरला. डेटा वापरातही देशाने मोठी उडी घेतली आहे, 2016 मध्ये 150 व्या स्थानावरून भारताने जगात पहिले स्थान पटकावले आहे.
 
रिटेल क्षेत्रातही रिलायन्स जगातील आघाडीच्या कंपन्यांना स्पर्धा देत आहे. ऑनलाइन असो वा ऑफलाइन, किरकोळ असो वा घाऊक, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने आपली पकड मजबूत केली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट सारख्या कंपन्या रिलायन्सला आपला प्रतिस्पर्धी मानतात. रिलायन्स रिटेलने वेगाने स्टोअर्स उघडली. विश्वास बसणार नाही, पण गेल्या वर्षी रिलायन्स रिटेलने एकाच दिवसात 7 स्टोअर्स उघडण्याचा विक्रम केला आहे. महसुलाच्या बाबतीतही ती देशातील पहिल्या क्रमांकाची रिटेल कंपनी बनली आहे.
 
दूरदृष्टी ठेवणाऱ्या मुकेश अंबानीं हे संपूर्ण जगात नावाजलेले आहे.पण मुकेश इथेच थांबणार नाहीत. भविष्यातील रिलायन्ससाठी त्याने आधीच स्वप्ने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. जामनगरमध्ये 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने नवीन ऊर्जेसाठी 5 गिगा कारखाना उभारला जात आहे. रिलायन्स सौरऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या नवीन ऊर्जा स्रोतांवरही वेगाने काम करत आहे.
 
Edited By - Priya Dixit