Marathi Biodata Maker

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:52 IST)
रुपयाच्या घसरणीमुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Nissan Tekton निसानची नवीन एसयूव्ही भारतात लॉन्च, १९.४ किमी प्रति लिटर मायलेज, किंमत जाणून घ्या

पावसाळ्यात शेतीची अवजारे सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी अश्या प्रकारे घ्या काळजी

३० वर्षे ३०० आलिशान हॉटेल्समध्ये मोफत मुक्काम; चार्ल्स शोभराजला आदर्श मानणारा 'तो' हायप्रोफाइल ठग अखेर गजाआड!

नगरसेवकांना पक्षबदलपासून रोखणे मोठे आव्हान; आदित्य ठाकरेंनी सूत्रे हाती घेतली; प्रत्येक नेत्यावर वैयक्तिकरित्या लक्ष

पाऊस पडताच तुमच्या घरासमोर पाणी साचते का? तर कुठे आणि कोणाकडे तक्रार करावी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments