संबंधित माहिती
- IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला
- IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
- शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला
- चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला
- IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला
IND vs BAN:रविचंद्रन अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले
भारतीय संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने माजी फिरकीपटू अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अश्विनने एक विकेट घेतली आणि यासह तो आशिया खंडातील कसोटी प्रकारात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. आशियातील रेड बॉल फॉरमॅटमध्ये अश्विनच्या नावावर आता 420 विकेट्स आहेत.
अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले असेल, पण श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन अजूनही आशियातील सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. आशियाई भूमीवर कसोटीत 612 बळी घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे, तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या सुरुवातीच्या दिवशी पावसाचे सावट असल्याने सामना उशिरा सुरू झाला, तर पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळही लवकर संपवावा लागला. नाणेफेक सकाळी 9 ऐवजी 10 वाजता झाली. त्याचवेळी सामना सकाळी साडेनऊ ऐवजी साडेदहा वाजता सुरू झाला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात 3 बाद 107 धावा केल्या होत्या.
Edited By - Priya Dixit
