संबंधित माहिती
- Navratri 2022:जाणून घ्या नवरात्रीत कांदा आणि लसूणाचे सेवन का करू नये
- Navratri Upay : 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत रोज करा हा उपाय, होईल धन वर्षा
- घटस्थापना : उत्साह संचारे अशी वेळ नवरात्रीची
- Smartphone Alert: स्मार्टफोन यूजर्सनी अॅप डाउनलोड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- Navratra Essay in Marathi नवरात्र निबंध
20 हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती
मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल 20 हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आज सोमवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.
“एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची20 हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.” असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
याचबरोबर “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे. अजून12 हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल.”
