एका पातेल्यात साखर घालून, साखरेचा एकतारी पाक करावा व त्याच्यात काजूची पूड घालून थोडे शिजवावे. साधारण घट्ट गोळा झाला की खाली उतरवून त्यात भाजलेला खवा घालावा व चांगले घोटावे.
नंतर पोळपाटाला तुपाचा हात लावून, त्यावर तो गोळा पातळ लाटून वड्या कापाव्यात. या वड्यांवर चांदीचा वर्खही लावतात.