शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (09:35 IST)

मुसळधार पावसानंतर मुंबईतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला धरले धारेवर

aditya thackeray
बुधवारी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना, बस आणि रिक्षाचालकांनाही समस्यांचा सामना करावा लागला. तसेच याबाबत शिवसेना (यूबीटी) नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे म्हणाले की, कालच्या पावसामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची अवस्था सर्वांनी पाहिली आहे. मुंबई ठप्प झाली होती, तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग जलमय झाला होता. ते म्हणाले की, मुंबईत काही झाले तर सर्वप्रथम फोटो काढायला गेलेले पालकमंत्री कुठे होते?  
 
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भागात दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत इतकं भीषण चित्र कधीच पाहिलं नाही. तसेच ते म्हणाले की, मुंबई, पुणे, ठाण्यासह अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका झाल्या नाही. मुंबईसारख्या शहरात 15 सहाय्यक आयुक्तही नाही. हे सर्व काम मुख्यमंत्री शिंदे यांची टीम पाहत असल्याचे ठाकरे म्हणाले. काल रस्त्यावर एकही अधिकारी दिसला का, असा प्रश्न त्यांनी केला. अधिकृत देखरेखीसाठी आपत्ती नियंत्रण कक्ष आहे पण काल ​​सर्व काही गडबड होते.
 
महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई लुटण्याचे आणि पक्ष फोडण्याचे त्यांचे राजकारण आहे. त्याचवेळी, आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांना झालेल्या शिक्षेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, याचे उत्तर ते स्वतः देतील, कारण ते स्वतः लढाई लढत आहे.

Edited By- Dhanashri Naik